शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

फाटाफुटीमुळे अपक्ष ठरणार निर्णायक !

By admin | Updated: October 7, 2014 05:52 IST

विधानसभा निवडणूक अवघ्या नऊ दिवसांवर आली असताना युती आणि आघाडीच्या फाटाफुटीमुळे बहुरंगी लढत होणार आहे.

स्रेहा मोरे, मुंबईविधानसभा निवडणूक अवघ्या नऊ दिवसांवर आली असताना युती आणि आघाडीच्या फाटाफुटीमुळे बहुरंगी लढत होणार आहे. पाचही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने निवडणूक सोपी नाही, हे नक्की. त्या पार्श्वभूमीवर, राजकीय समीकरणे बदलल्यामुळे सर्वांचेच लक्ष ‘खुर्ची’कडे लागून राहिले आहे. मात्र या सत्तेसाठी यंदा राज्यभरात निवडणुकीच्या रिंगणात असलेले एकूण १६८६ अपक्ष उमेदवार निर्णायक ठरणार आहेत.निवडणुकीच्या तोंडावरच युती आणि आघाडीमध्ये ताटातूट झाली. प्रमुख पक्षांनी उमेदवार शोधण्यासाठी अगदी टोकाची खेचाखेची केली. याचाच परिणाम म्हणून निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची बंडखोरीही वाढली. यामुळे आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि मनसे या प्रमुख पक्षांमध्ये पंचरंगी लढत होणार आहे. मात्र, या सर्वच पक्षांना सत्तास्थापनेत अपक्ष उमेदवारांकडे ‘फिल्डिंग’ लावावी लागणार आहे. अपक्ष उमेदवारांचा हा दणका लक्षात घेता त्यांचे राजकीय महत्त्व दुर्लक्षित करून चालणार नाही. यंदाच्या निवडणुकीतही त्यांच्यामुळे सत्ताकारणाचा आलेख बदलेल असे मानले जाते आहे. राजकारण केवळ आकड्यांचा खेळ नसतो आणि मुख्य म्हणजे येथे दोन आणि दोन-चार नव्हे तर तीन किंवा पाचही होतात. त्यामुळे या निवडणुकीत हे अपक्ष उमेदवार कोणाचे पारडे जड करतात आणि कोणाकडे पाठ फिरवतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.