शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व

By admin | Updated: October 4, 2015 01:48 IST

ज्येष्ठ लेखक यशवंत पाध्ये यांच्या निधनाला ३० सप्टेंबर रोजी १ वर्ष झाले. १९७२ सालापासून शेवटपर्यंत त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख....

- मंदाकिनी भटज्येष्ठ लेखक यशवंत पाध्ये यांच्या निधनाला ३० सप्टेंबर रोजी १ वर्ष झाले. १९७२ सालापासून शेवटपर्यंत त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख.... यशवंतरावांचा आणि माझा परिचय झाला १९४२मध्ये. मी लेखनिक या नात्याने काही काम आहे का या भावनेतून त्यांना पत्र लिहिले होते; आणि ८ दिवसांतच मला बोलावले गेले. आमचे जुजबी बोलणे झाले आणि कामाला सुरुवात झाली, ती अगदी शेवटचे ‘पंचायतन’ या जुलै २०१४च्या पुस्तकापर्यंत! एवढ्या अवधीत जवळजवळ सव्वा ते दीड लाख पृष्ठांचे काम मी पार पाडले. १९८०पर्यंत झेरॉक्स हा प्रकार फारसा नव्हता. त्यामुळे कधीकधी एकेका लेखाच्या पाच-पाच प्रती याप्रमाणे पन्नास पृष्ठे एका दिवसात ते माझ्याकडून लिहून घेत असत. नंतर झेरॉक्सचा जमाना आला आणि एकाच लेखाच्या अनेक प्रती लिहून घेणे बंद झाले. पण लेखांची संख्या वाढली. त्यांच्या लिखाणामुळे त्यांनी साहित्याच्या बँकेत मात्र ‘बँक बॅलन्स’ अफाट कमावला होता. शेवटचे त्यांचे पुस्तक होते पाच संतांची ओळख करून देणारे ‘पंचायतन’!साहित्य क्षेत्रात यशवंतराव प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे यांना गुरूस्थानी मानत. यशवंतरावांनी आरंभी लेखन केले ते बरेचसे राजकीय, वैचारिक, चरित्रात्मक आणि मुलाखती स्वरूपातले! प्रत्येक लेख हा मागील लेखापेक्षा सरस असायचा. त्या लेखात अनेक बारकावे सहजपणे दाखवलेले असायचे! एकामागून एक जवळजवळ ४०-४५ पुस्तकांतून व्यक्तिचित्रण, राजकारण, धार्मिक, ऐतिहासिक, चिंतनात्मक, सामाजिक, बाल साहित्य असे विषय हाताळले गेले. जीवन समर्थपणे जगणारा लेखक, पत्रकार, स्तंभलेखक, समाजसेवक असा हा आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘यशवंत’ झाला. त्यांनी गर्व, मोठेपणा, अहंकार याला कधीही जवळ येऊ दिलं नाही. त्यांचे हे गुण ‘अर्थप्राप्ती’पेक्षा ‘गुणप्राप्ती’ देऊन गेले. यशवंतराव हे व्यक्तिमत्त्वच असं होतं की ते आपण विसरूच शकणार नाही.