शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत !

By admin | Updated: January 14, 2017 00:48 IST

सुधारणांसाठी संधी; अकोला मनपाच्या सर्वच जागा लढण्याची तयारी.

अकोला, दि. १३- महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी करण्याचा भारिप-बहुजन महासंघाचा अद्याप निर्णय झाला नसून, महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या नावावर भारिप-बमसं स्वबळावर अकोला महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे, असे संकेत भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिले. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहर सुधारणांसाठी मतदारांना संधी उपलब्ध झाल्याचे सांगत, या निवडणुकीत सर्वच जागा लढण्याची पक्षाची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यासाठी अकोल्यात आले असता, ह्यलोकमतह्णसोबत ते बोलत होते. मनपा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती-आघाडी करण्याचा निर्णय भारिप-बमसंने अद्याप घेतला नाही. त्यामुळे कोणाशीही युती व आघाडी न करता मनपाच्या सर्वच जागा स्वबळावर लढण्याची पक्षाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला शहरात मूलभूत सोयी-सुविधांच्या दृष्टीने सुधारणा झाल्या पाहिजे, असे मतदारांना वाटत असेल, तर मनपा निवडणुकीच्या माध्यमातून शहरातील मतदारांना ही संधी आली आहे. शहर विकासाच्या दृष्टीने शहरातील मतदारांनी या निवडणुकीत निर्णय घेतला पाहिजे, असे अँड. आंबेडकर यांनी सांगितले.वॉर्डा-वॉर्डातून कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या उमेदवारांना प्राधान्य!मनपा निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाची उमेदवारी देताना, शहरातील वॉर्डा-वॉर्डातून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या इच्छुक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामध्ये संबंधित इच्छुक उमेदवारांच्या कार्याची पडताळणी केल्यानंतरच उमेदवारी निश्‍चित करण्यात येणार असल्याचे अँड.आंबेडकर यांनी स्पष्ट केले.उपसमिती करणार उमेदवारांची निवड !मनपा निवडणुकीसाठी भारिप-बमसंने निवडणूक निरीक्षक उपसमिती गठित करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारुन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची निवड या उपसमितीकडून करण्यात येणार असल्याचेही अँड.आंबेडकर यांनी सांगितले.कार्यकर्ता जगला पाहिजे; युती-आघाडी नकोच !पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता जगला पाहिजे, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची युती किंवा आघाडी नसावीच, असे मत अँड.आंबेडकर यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती -आघाडी न केल्यास पक्षातील कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त न्याय देणे शक्य होते, अशी आपली भूमिका असून, पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता जगणे महत्त्वाचे आहे, असेही अँड.आंबेडकरांनी सांगितले.