"जातपात न मानता राजकारण करण्याचं..."; राज ठाकरेंनी सांगितलं अजितदादांच्या कामाचं खास वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 13:07 IST2026-01-28T13:06:16+5:302026-01-28T13:07:12+5:30

Plane Crash in Baramati: या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं असं राज ठाकरे म्हणाले.

Ajit Pawar Dead: "Doing politics without considering caste..."; MNS Raj Thackeray Raj Thackeray paid tribute to Ajit Pawar | "जातपात न मानता राजकारण करण्याचं..."; राज ठाकरेंनी सांगितलं अजितदादांच्या कामाचं खास वैशिष्ट्य

"जातपात न मानता राजकारण करण्याचं..."; राज ठाकरेंनी सांगितलं अजितदादांच्या कामाचं खास वैशिष्ट्य

मुंबई - माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले तरी त्यांनी नंतर स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली अशी शोकभावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 

राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या राजकीय कारकि‍र्दीवर प्रकाश टाकला. राज ठाकरे म्हणाले की, १९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता. जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील असं त्यांनी सांगितले.

तसेच प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांपेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.  अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. 

दरम्यान, अजित पवारांचं मला आवडणारी अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकारणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की. राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे असं सांगत राज ठाकरे यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. 

Web Title : राज ठाकरे ने अजित पवार की निष्पक्ष राजनीति, विकास कार्यों की सराहना की

Web Summary : राज ठाकरे ने अजित पवार की प्रशासनिक क्षमता, पिंपरी-चिंचवड और बारामती में विकास कार्यों और राजनीति के प्रति उनके निष्पक्ष दृष्टिकोण की सराहना की। उन्होंने पवार के स्पष्ट संवाद पर प्रकाश डाला और महाराष्ट्र के लिए ऐसे नेता के नुकसान पर शोक व्यक्त किया।

Web Title : Raj Thackeray Praises Ajit Pawar's Non-Partisan Politics and Development Work

Web Summary : Raj Thackeray lauded Ajit Pawar's administrative skills, development work in Pimpri-Chinchwad and Baramati, and his non-partisan approach to politics. He highlighted Pawar's clear communication and lamented the loss of such a leader for Maharashtra.