शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:29 IST

जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात एकूण ७६७ हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Rahul Gandhi on Farmer Suicide: शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. दरवर्षी अनेक शेतकरी नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतात. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'सरकार शेतकऱ्यांचा नाही, तर श्रीमंतांचा विचार करते. मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार म्हटले होते, परंतु आज शेतकऱ्यांचे आयुष्य अर्धे होत चालले आहे,' अशी टीका राहुल यांनी केली.

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात एकूण ७०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्या बहुतांश घटना विदर्भातील आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबद्दल काँग्रेस आमदारांनी महाराष्ट्र सरकारला जाबही विचारला. काँग्रेस आमदारांनी सरकारने दिलेली १ लाख रुपयांची रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे. 

३ महिन्यांत ७०० हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या राहुल गांधींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, 'अवघ्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे फक्त आकडे नाहीत, तर ७६७ शेतकऱ्यांची उद्ध्वस्त घरे आहेत. ही अशी कुटुंबे आहेत, जी कधीही सावरू शकणार नाहीत. सरकार या प्रकरणात पूर्णपणे गप्प आहे. ते फक्त उदासीनतेने पाहत आहे.'

सरकारचे फक्त श्रीमंतांवर लक्ष 'शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत. बियाणे महाग आहेत, खते महाग आहेत, डिझेल महाग आहे. पण एमएसपीची कोणतीही हमी नाही. जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात, तेव्हा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. पण मोदी सरकार श्रीमंतांचे करोडो रुपयांचे कर्ज सहजपणे माफ करते.' याचे उदाहरण देत त्यांनी अनिल अंबानींच्या ४८,००० कोटी रुपयांच्या एसबीआय फसवणुकीचा उल्लेख केला. 

सरकार शेतकऱ्यांना मारत आहेराहुल गांधी यांनी केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देत म्हटले की, 'मोदीजी म्हणाले होते की, ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतील. शेतकरी आत्महत्यांच्या घटनांकडे पाहता, असा अंदाज लावता येतो की, उत्पन्न दुप्पट झाले नाही, तर शेतकऱ्यांचे आयुष्य निम्मे होत चालले आहे. ही व्यवस्था शेतकऱ्यांना शांतपणे आणि सतत मारत आहे. मोदीजी फक्त त्यांच्याच तमाशा पाहत आहेत,' अशी घणाघाती टीकाही राहुल यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीfarmer suicideशेतकरी आत्महत्याcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी