शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:29 IST

जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात एकूण ७६७ हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Rahul Gandhi on Farmer Suicide: शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. दरवर्षी अनेक शेतकरी नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतात. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'सरकार शेतकऱ्यांचा नाही, तर श्रीमंतांचा विचार करते. मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार म्हटले होते, परंतु आज शेतकऱ्यांचे आयुष्य अर्धे होत चालले आहे,' अशी टीका राहुल यांनी केली.

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात एकूण ७०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्या बहुतांश घटना विदर्भातील आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबद्दल काँग्रेस आमदारांनी महाराष्ट्र सरकारला जाबही विचारला. काँग्रेस आमदारांनी सरकारने दिलेली १ लाख रुपयांची रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे. 

३ महिन्यांत ७०० हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या राहुल गांधींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, 'अवघ्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे फक्त आकडे नाहीत, तर ७६७ शेतकऱ्यांची उद्ध्वस्त घरे आहेत. ही अशी कुटुंबे आहेत, जी कधीही सावरू शकणार नाहीत. सरकार या प्रकरणात पूर्णपणे गप्प आहे. ते फक्त उदासीनतेने पाहत आहे.'

सरकारचे फक्त श्रीमंतांवर लक्ष 'शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत. बियाणे महाग आहेत, खते महाग आहेत, डिझेल महाग आहे. पण एमएसपीची कोणतीही हमी नाही. जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात, तेव्हा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. पण मोदी सरकार श्रीमंतांचे करोडो रुपयांचे कर्ज सहजपणे माफ करते.' याचे उदाहरण देत त्यांनी अनिल अंबानींच्या ४८,००० कोटी रुपयांच्या एसबीआय फसवणुकीचा उल्लेख केला. 

सरकार शेतकऱ्यांना मारत आहेराहुल गांधी यांनी केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देत म्हटले की, 'मोदीजी म्हणाले होते की, ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतील. शेतकरी आत्महत्यांच्या घटनांकडे पाहता, असा अंदाज लावता येतो की, उत्पन्न दुप्पट झाले नाही, तर शेतकऱ्यांचे आयुष्य निम्मे होत चालले आहे. ही व्यवस्था शेतकऱ्यांना शांतपणे आणि सतत मारत आहे. मोदीजी फक्त त्यांच्याच तमाशा पाहत आहेत,' अशी घणाघाती टीकाही राहुल यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीfarmer suicideशेतकरी आत्महत्याcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी