शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 18:31 IST

Ganesh Chaturthi 2025: गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबात सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अमरावती: पगारासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा करण्याची मुळीचे आवश्यकता नाही. कारण बाप्पाने शासनाला सांगितले असावे, म्हणूनच तर सरकार कर्मचाऱ्यांवर मेहरबान झाले. कर्मचाऱ्यांना गणपतीचे धूमधडाक्यात स्वागत करण्यासाठी अगोदरच वेतन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता चिंता नसावी, असाच सूर कर्मचाऱ्यांचा उमटला आहे.

राज्य शासनाने यंदापासून गणेश उत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे गणपती आणि महाराष्ट्र हे समीकरण हे अख्ख्या जगाला माहिती आहे. बाप्पाच्या आगमनापासून तर विर्सजनापर्यंत १० दिवस म्हणजे महाराष्ट्रात घरा-घरात, गाव-खेड्यात नवचैत्यन्याचा महापूर ओसंडून वाहतो. अगदी घरातील स्वच्छतेपासून तर बाप्पाच्या सजावटीपर्यंत प्रत्येक जण नियोजनात तल्लीन झालेला दिसून येतो. कोकणातील चाकरमान्यांना तर घराकडे सुखरूप जाता यावे, यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्यांची व्यवस्था केली जाते. महाराष्ट्रात गणपती उत्सव शेकडो वर्षांपासून आनंददायी साजरा होतो. आता तर गणपती उत्सव हा ‘राज्य उत्सव’ झालेला आहे.

१७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा गिफ्टराज्य शासनाच्या सेवेतील १७ लाख कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा बाप्पा पावले असे म्हणायला काही हरकत नाही. कारणसुद्धा तसेच आहे.राज्य शासनाच्या वित्त विभागाने २१ ऑगस्ट २०२५ रोजी आदेश जारी करून राज्य सेवेतील कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, महामंडळे या आस्थापनामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात होणारे वेतन ऑगस्टमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता शासन निर्णय परिच्छेद १ (१८) मधील तरतूद शिथिल करण्यात आली आहे.

आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सूचनाशासनाच्या वित्त विभागाने राज्यातील सर्व कोषागारे तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणाऱ्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना त्यांच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे वेतन २६ ऑगस्टपर्यंत करण्याचे निर्देश दिले आहेत. याकरिता महाराष्ट्र नियम १९६८ च्या खंड १ मधील नियम क्रमांक ३२८ मधील यापूर्वीची असलेली तरतूद तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात आलेली आहे. निम शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा अगोदर वेतन मिळणार आहे.

खर्चाचा बसावा मेळ...महाराष्ट्रात गणरायाचे आगमन म्हणजे स्वर्गसुख मानले जाते. बुधवार, २७ ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन हे चैतन्य निर्माण करणारे आहे. यात यंदापासून शासनानेसुद्धा गणपती उत्सवाला ‘राज्य उत्सव’ जाहीर केला आहे, तर शासनाने कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबरमध्ये न देता ऑगस्टमध्येच प्रदान करण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयामुळे शासकीय कर्मचारी आणखी जोशात बाप्पाचे स्वागत करणार, हे मात्र नक्की.

राज्य शासनाने गणपती उत्सव साजरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अगोदर वेतन देण्याचा निर्णय हा अतिशय चांगला आहे. सार्वजनिक किंवा घरगुती गणपती उत्सव हा सर्व समाजाने, एकोप्याने साजरा करावा हाच उद्देश आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांसमोर येणारे आर्थिक संकट काहीसे कमी होणार आहे.-डी.एस. पवार, महासचिव, मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटना.

टॅग्स :Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार