शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 07:41 IST

पुरामुळे मराठवाड्यात ९१० विद्युत डीपी आणि ९ हजार ७२० विद्युतखांबांचे नुकसान झाले आहे. यातून महावितरणला तब्बल ३३.८८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अनेक गावांत वीजपुरवठा बंद आहे.

पुरुषोत्तम करवालोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव (जि. बीड) : पैठणच्या जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी पोहोचल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. माजलगाव तालुक्यातील १६ गावांतील पुराचा वेढा यामुळे कमी होईना अशी स्थिती आहे. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी गेले. गोदावरी आणि सिंदफणाकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्या, मंजरथ येथे दोन नद्यांचा संगम असल्याने निम्मे गाव पुराच्या पाण्यात आहे. मंगळवारी पाणी पोहोचताच अनेक गावांमध्ये धावाधाव झाली. पूरग्रस्थांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

पुराच्या फटक्याने वीज बंदच छत्रपती संभाजीनगर

पुरामुळे मराठवाड्यात ९१० विद्युत डीपी आणि ९ हजार ७२० विद्युतखांबांचे नुकसान झाले आहे. यातून महावितरणला तब्बल ३३.८८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अनेक गावांत वीजपुरवठा बंद आहे.

गोदावरीच्या पुराचा तडाखा, १०० हेक्टर मिरची पाण्यातगडचिरोली : अवकाळी पावसाने पुन्हा उग्र रूप दाखवले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. प्राणहिता, गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील कोत्तापल्ली, आयपेटा, वडधम, मुत्तापूर माल, अंकिसा, असरअल्ली, सुकारेली, टेकडाताला या गावांतील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका मिरची उत्पादकांना बसला. तब्बल १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.'शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस कशी काय दिली?'मुंबई : राज्यात निम्म्यापेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले असताना अशा वेळी बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस कशी काय देण्यात आली? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.उजनीतून विसर्ग कमी, पंढरपुरात पूरस्थिती कायमपंढरपूर : उजनी धरणातून सोडण्यात आलेला सव्वा लाखाचा विसर्ग कमी करुन ३० हजार करण्यात आला आहे. वीरचा विसर्ग कमी करून २५०० क्यूसेक करण्यात आला आहे. त्यामुळे (चंद्रभागा) नदीची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. मात्र, पंढरपुरात मंगळवारी १ लाख १० हजारांचा विसर्ग वाहत असल्याने पूरपरिस्थिती कायम होती. व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरल्यामुळे चार कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.सोलापूर : पोहत जाऊन केला ७४ गावांतील वीजपुरवठा सुरळीत, २१ गावांत अजूनही अंधारच, बोटीतूनही प्रवास करीत गावे केली प्रकाशमय.जळगाव : बोरी नदीवरील बंधारा दौड वर्षातच वाहून गेला वाहून. संपर्क तुटला.नाशिक : जिल्ह्यात दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने दिलासा. गंगापूरमधून केवळ ९९० क्युसेक विसर्ग.

मदतीचा ओघराज्य बँकेकडून १० कोटीमुंबई : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० कोटी रुपयांची मदत दिली. निधीचा धनादेश मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.साई संस्थानकडून पाच कोटीअतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी श्री साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ कोटींची मदत जाहीर केली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली.२२ हजार ग्रामपंचायत अधिकारी देणार एक दिवसाचा पगारबीड : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील २२,००० ग्रामपंचायत अधिकारी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Flood Havoc Continues: Villages Submerged, Power Grid Damaged, Aid Pours In

Web Summary : Godavari floods persist, isolating 16 villages. Power infrastructure suffers massive damage in Marathwada. Farmers face crop losses, debt notices spark outrage. Aid arrives from state bodies and village officials to support affected communities.
टॅग्स :floodपूरMaharashtraमहाराष्ट्र