शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

भिज पावसाने खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST

शिरुर अनंतपाळ: आठवडाभरापासून सुरू असलेल्या भिज पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील प्रमुख जलसाठे ...

शिरुर अनंतपाळ: आठवडाभरापासून सुरू असलेल्या भिज पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील प्रमुख जलसाठे तहानलेलेच असून, जलस्त्रोतांमध्ये मर्यादित पाणीसाठा असल्याने जलसाठे पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक असून, निम्मा पावसाळा संपला तरीही मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी अत्यल्प असल्याने शेतकऱ्यातून चिंता व्यक्त केली जात आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडीसारखे मध्यम प्रकल्प तर डोंगरगाव येथे बॅरेज आणि हालकी येथे कोल्हापुरी बंधारा असे जलस्त्रोत असल्याने शिरुर अनंतपाळ प्रकल्पाचा तालुका म्हणून सर्वत्र ओळखला जातो, परंतु यंदा पावसाळा वेळेवर झाला असला तरी, दोन महिने उलटले तरीही सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे.त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ शकली नाही.परिणामी या प्रकल्पावरून कार्यान्वित करण्यात आलेल्या विविध पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत. शिवाय धरणसाठ्यातील पाण्यावर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बागायती शेती अवलंबून असल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या भिज पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी धरणातील साठ्याची पाणीपातळी अत्यल्प आहे. उपयुक्त पाणीसाठा २५ टक्क्यांच्या आतच आहे.त्यामुळे धरणसाठे ओव्हर फ्लो होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे शेतकरी जिल्हा बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील, धोंडिराम कारभारी, विठ्ठलराव पाटील यांनी सांगितले.

ऊसासाठी जलस्त्रोत भरणे आवश्यक...

तालुक्यात यंदा ३५०० हजार हेक्टर्सवर नवीन उसाची लागवड झाली आहे. घरणी, साकोळ, पांढरवाडी सारखे मध्यम प्रकल्प भरले तर किमान दोन वर्षे उसाची जोपासना होईल या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे, परंतु निम्मा पावसाळा संपला तरीही जलस्त्रोतांमध्ये मर्यादित पाणीसाठा असल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतातुर झाले असून जलस्त्रोत भरणे आवश्यक असल्याचे सांगत आहेत.

सरासरीच्या ५० टक्के पाऊस..

शिरुर अनंतपाळ तालुक्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान ७५० मिलीमीटर आहे, परंतु यंदा निम्मा पावसाळा संपला तरीही आजतागायत केवळ ३८३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे सरासरीच्या केवळ ५० टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे आठवडाभरापासून सुरू असलेल्या भिज पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी जलसाठे मात्र तहानलेलेच आहेत.