शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारून कारखान्याला आणखीन वैभव प्राप्त करून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST

विलास २ मांजरा परिवारात येण्यापूर्वी मोठ्या आर्थिक अडचणीत होता. माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात व लातूर जिल्हा मध्यवर्ती ...

विलास २ मांजरा परिवारात येण्यापूर्वी मोठ्या आर्थिक अडचणीत होता. माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने मांजरा परिवारात आता एकूण आठ कारखाने झाले असून सर्वच उत्कृष्टरीत्या चालत आहेत. यातून परिसराच्या सर्वांगीण विकासाला त्यांचा हातभार लागत आहे. विलास युनिट २ हा कारखाना खरेदीसाठी घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परतफेड मुदतीत केल्याबद्दल संचालक मंडळ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन संस्थापक अध्यक्ष अमित देशमुख यांनी केले.

विलास कारखान्याच्या अध्यक्ष वैशालीताई देशमुख म्हणाल्या,

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यातही सहकारी साखर कारखाने यशस्वी करण्याचा प्रयोग लोकनेते विलासराव देशमुख यांनी मांजरा कारखान्याच्या उभारणीतून चालवला होता, त्यांचा तो प्रयोग यशस्वी तर झालाच. शिवाय पुढे तो देशासाठी एक आदर्श प्रयोग ठरला आहे. मांजरा कारखान्याच्या यशस्वी प्रयोगामुळे लातूर परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती. त्यातून १९९८-९९ च्या दरम्यान अतिरिक्त उसाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याकाळी नुकतेच केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करून अमित देशमुख यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली होती. यादरम्यान शेतकऱ्यांशी हितगूज करत असताना त्यांनी सदरील समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. केवळ निर्धार व्यक्त करून न थांबता सरासरी २५ वर्षे वयाच्या तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी अवघ्या ९ महिन्यांत विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्याने आजवर २८ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावले आहेत. सर्वांत कमी वयाच्या संचालक मंडळाने विक्रमी कमी वेळेत कारखाना उभा करून तो देशात आदर्श ठरावा, अशा पद्धतीने यशस्वीरीत्या चालवला आहे, या कारखान्याने दुसरा कारखाना म्हणजे आताचा विलास युनिट २ विकत घेतला असून तोही उत्कृष्टरीत्या चालवण्यात येत आहे.

उदगीर येथील प्रियदर्शनी हा कारखाना तर लातूर जिल्ह्यातील होता, शिवाय या कारखाना परिसरात माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा ही लोकनेते विलासराव देशमुख यांची मनोमन इच्छा होती. त्यामुळे प्रारंभी मांजरा कारखान्याच्या वतीने तो भाडेतत्त्वावर चालवण्यात आला; परंतु हा करार संपल्यानंतर पुन्हा तो कारखाना बंदच राहणार अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नंतर अमित देशमुख यांनी तो कारखाना विलास साखर कारखान्यामार्फत विकत घेण्याचा निर्णय घेतला व कारखान्याची खरेदी झाली; परंतु पुढे कारखान्याची दुरुस्ती आणि तर कामकाजासाठी कर्ज घेऊन भांडवल उभारावे लागले, अनेक अडचणींवर मात करीत आता हा कारखाना यशस्वीरीत्या चालवण्यात येत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच कारखाना उत्तमरीत्या चालवण्यात येत आहे.