शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरच्या फळबाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST

उदगीर : येथील फळबाजारात वाढत्या उन्हामुळे पाणीदार फळांची आवक माेठ्या प्रमाणावर होत आहे. शरिरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाटी नागरिक ...

उदगीर : येथील फळबाजारात वाढत्या उन्हामुळे पाणीदार फळांची आवक माेठ्या प्रमाणावर होत आहे. शरिरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाटी नागरिक खरबूज, कलिंगड, द्राक्षे, मोसंबी, संत्रा, अननस या फळांना प्राधान्य देत आहत. या फळांच्या सेवनाने नागरिक शरिरात असलेली उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

उदगीर शहरातील भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालयासमोर भरणारा बाजार, छत्रपती शाहू महाराज चौक, कॅप्टन चौक, बसस्थानक, उमा चौक येथील व्यापारी आणि इतर फेरीवाले केवळ कलिंगड, खरबूज, चिकू, द्राक्षे, काकडी याचा व्यवसाय करु लागले आहेत. उदगीरात मार्च, एप्रिल, मे महिन्यात कडक उन्हाचे चटके बसतात. या कडक उन्हाळी वातावरणात शरिरातील पाणीदेखील कमी होऊ लागते. यावर उपाय म्हणून पाणीदार फळांचे सेवन करण्यात येते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीदार फळांची आवक होत आहे. १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंतचे खरबूज बाजारात आले आहे. कलिंगड १० रुपयांपासून ते १००, द्राक्षाची ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे व्यापारी हामेद चौधरी यांनी सांगितले. तसेच मोसंबी, संत्र्याची आवकही चांगली असल्याची माहिती त्यांनी दिली. उदगीर तहसील कार्यालयासमोर शेतकरी स्वतःच्या वाहनातून कलिंगड, खरबूज आणून त्याची विक्री करत आहेत.

उदगीर तालुक्यातील तोंडार, हैबतपूर गावातून शेतकरी त्यांचा माल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. उदगीर शहरातील बसस्थानक, देगलूर रोड, शिवाजी चौक, उमा चौक, बिदर रोड आदी मार्गांवर खरबूज, कलिंगड, द्राक्षे, मोसंबी, संत्रे आणि अननस विक्रीसाठी हातगाडे लागले आहेत. फळ विक्रेत्यांकडून पाणीदार फळांची ग्राहक खरेदी करत आहेत. उन्हातून आल्यानंतर पालकही आपल्या मुलांना चविष्ट पाणीदार फळे खाण्यास देत आहेत. त्यामध्ये अननस, खरबूज, कलिंगड, मोसंबी, संत्रे आदी फळे लहान मुलांना दिली जात आहेत.

ज्यूस सेंटर, आईस्क्रीम गाड्यांवर गर्दी...

उदगीर शहरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, ज्यूस सेंटर आणि आईस्क्रीमच्या गाड्यांवर ग्राहकांची गर्दी हाेत आहे. गरिबांचा फ्रिज असलेल्या माठाचे महत्त्वही आता वाढले आहे. उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्यामुळे शरिरातील उष्णता कमी होण्याला मदत होते. शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानासमोर आणि पोलीस ठाणे, संत गाडगेबाबा चौक येथे माठ विक्रीसाठी दुकाने लागली आहेत. ५० ते १५० रुपयांपर्यंत माठ उपलब्ध आहेत. फ्रिजमधील पाणी थंड करुन पिण्यापेक्षा माठातील पाणी पिणे अधिक चांगले असल्याचे नागरिकांचे मत आहे. आता माठाला प्लास्टिकचे नळ बसविण्यात आले आहेत.