शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

४८९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:22 AM

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या १९५ जागांसाठी एकूण ४८९ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी संथगतीने मतदान सुुरू होते. दुपारी १२ वा.नंतर मुंबई, ...

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या १९५ जागांसाठी एकूण ४८९ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी संथगतीने मतदान सुुरू होते. दुपारी १२ वा.नंतर मुंबई, पुणे, हैदराबाद, निजामाबाद, औरंगाबाद येथून मतदार वाहनांंतून येत असल्याने मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी, नायब तहसीलदार राजाराम खरात हे मतदान केंद्रावरील प्रत्येक तासाला माहिती घेत होते. उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी हे दूरध्वनीवरून तालुक्यातील मतदान केंद्रांंची माहिती घेत होते. मतदान केंद्रांंवर अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह मतदान केंद्रांंवर भेटी देऊन पाहणी करीत होते.

दोन दिवस पोलिसांचा पहारा...

तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती मतदानासाठी उत्साहात येत होत्या. कोरोनामुळे मतदारांना मास्क घातल्याशिवाय मतदान केंद्रांंवर प्रवेश दिला जात नव्हता. प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझरचा वापर केला गेला.

तालुक्यातील घोणसी, वांजरवाडा, धामणगाव, रावणकोळा, सोनवळा, बेळसांगवी, कुणकी या गावांतील ग्रामपंचायतींवर तालुक्याचे लक्ष असून येथील लढती चुरशीच्या झाल्या आहेत.

सायंकाळी ५.३० वा.नंतर मतदान यंत्रे सील करून पोलीस बंदोबस्तात तहसील कार्यालयात आणण्यात आले. मतपेट्यांवर दोन दिवस पोलीस बंदोबस्तात करडी नजर राहणार आहे. सोमवारी तहसील परिसरात नागरिकांनी गर्दी न करता उमेदवार व त्यांचे एजंट उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

उमेदवारांची धाकधूक वाढली...

सोमवारी सकाळी १० वा. पोलीस बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे. तालुक्यात अनेक मतदान केंद्रांवर क्राॅसिंग मतदान झाल्यामुळे कोण विजयी होणार, हे मतमोजणीनंतर समजणार आहे. त्यामुळे तीन दिवस उमेदवारांना विचार करीत रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. तालुक्यात एकूण मतदारांची संख्या ३१ हजार ३९६ असून त्यात १६ हजार ६४८ पुरुष तर महिला १४ हजार ७४८ आहेत. त्यापैकी एकूण दोन हजार ३४४ मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी ८२.७२ टक्के अशी आहे.