शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग; वाहन चालविणे कसे परवडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : गुरुवारी लातूर शहरात पेट्राेल १०८ रुपये ८४ पैसे तर डिझेलचे दर ९६ रुपये ९६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : गुरुवारी लातूर शहरात पेट्राेल १०८ रुपये ८४ पैसे तर डिझेलचे दर ९६ रुपये ९६ पैशांवर होते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, विमानात वापरण्यात येणाऱ्या एटीएफ पेट्रोलचा दर ६६ रुपये प्रतिलीटरवर आहे. त्यामुळे विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग झाले असून, सर्वसामान्यांना वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच महागाईच्या भडक्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. शासनाने इंधनाची दरवाढ कमी करुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

पगार कमी, खर्चात वाढ...

कोरोनामुळे पगार कपात झाली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा कमी पगार हाती येत आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमतीचा आलेख वाढतच आहे. त्यामुळे घर चालवावे कसे, हा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही दिवसात दर कमी न झाल्यास दुचाकीवर फिरणेही अवघड होणार आहे. दरवाढीमुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याची गरज आहे. - चेतन हाके

गेल्या दीड वर्षांपासून व्यवहारांवर निर्बंध आले आहेत. महिन्याला येणारा पगारही पुरेनासा झाला आहे. मुलांचे शिक्षण, शाळांची फी, किराणा, दवाखाना या गोष्टींसाठी काटकसर करावी लागत आहे. मार्केटमध्ये सद्यस्थितीत सर्वच व्यवहार डबघाईला आले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पूर्वी ६०० ते ७०० रुपयांना मिळणारा गॅस ८६० रुपयांवर पोहोचला आहे तर पेट्रोल १०८ आणि डिझेल ९६ रुपयांवर गेले आहे. शासनाने यामध्ये निर्णय घेऊन सर्वसामान्यांवर असलेेले महागाईचे ओझे कमी करण्याची गरज आहे. - सचिन निंबोळकर

कोरोनामुळे खर्चात भर; पाचशेच्या ठिकाणी हजार...

कोरोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. जिथे पूर्वी ५०० रुपये लागायचे तिथे आज हजार रुपये खर्च करावे लागत आहेत.

शहरातून गावाकडे जायचे म्हटले तर ४ लीटर पेट्रोल लागते. सरासरी ५०० रुपयांचा खर्च लागतो. मात्र, एस. टी. बसने गेल्यास केवळ २०० रुपये लागतात. त्यामुळे काहीजणांनी गावाकडे जाण्यासाठी बसचा आधार घेतला आहे.

कोरोनामुळे अर्थकारण कोलमडल्याने सर्वच वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याचे चित्र आहे.