शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

लिंबाळवाडीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST

चाकूर : तालुक्यातील लिंबाळवाडी येथे एका कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे बाधितांची संख्या १८८वर पोहोचली होती. प्रशासनाने तातडीने ...

चाकूर : तालुक्यातील लिंबाळवाडी येथे एका कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे बाधितांची संख्या १८८वर पोहोचली होती. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गाव आठ दिवसांसाठी बंद केले होते. परिणामी, संसर्ग रोखण्यास मदत झाली असून, आता गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. सध्या केवळ १४ ॲक्टिव्ह रुग्ण असून, ते उपचार घेत आहेत.

चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी हे १२०० लोकसंख्येचे गाव आहे. गावात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात धार्मिक कार्यक्रम झाला. त्यास गावातील अबालवृद्ध हजर होते. तेथून गावात कोरोनाचा शिरकाव झाला आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली. दिवसेंदिवस संसर्ग वाढू लागला. त्यामुळे प्रशासनही हादरले. गावात कोविड चाचणी करण्यात आली. तेव्हा १८८ बाधित आढळले. त्यामुळे प्रशासनाने गावबंद केले.

गावातच राहून काहीजण उपचारानंतर बरे झाले. काहींना चाकूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. याच कालावधीत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे गावकऱ्यांनी काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत झाली असून, आज गाव या संकटातून सावरले आहे. आता गावात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वजण कडक निर्बंध पाळत आहेत.

गावातील प्रत्येक घरात पॉझिटिव्ह...

गावात कोरोनाचा संसर्ग होईल, असे वाटत नव्हते. सुरुवातीस एकजण पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर संसर्ग सुरु झाला आणि गावातील प्रत्येक घरात पॉझिटिव्ह आढळत होता. प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलली. सर्व गावकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. गावकरी आज एकदिलाने या संकटातून बाहेर आले आहेत, असे लिंबाळावाडीचे सरपंच शरण बिराजदार यांनी सांगितले.

मास्कशिवाय कोणीही घराबाहेर येत नाही...

कोरोनाच्या संसर्गानंतर गावात शांतता आहे. अबालवृध्द मास्कशिवाय घराबाहेर पडत नाहीत. गावातील कोणीही कोणाच्याही घरी जात नाहीत. गावातील धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने आम्ही एकत्र आलो होतो. मला काही त्रास झाला नाही. मात्र, दाेन नाती पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्याही आता ठणठणीत झाल्या आहेत, असे गावातील सगुणाबाई बिराजदार यांनी सांगितले.

नियमांचे काटेकोरपणे पालन...

आता गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. कोरोनामुळे गावातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आता गावातील प्रत्येकजण नियमांचे पालन करीत आहे. सर्वजण फिजिकल डिस्टन्स ठेवून एकमेकांशी बोलतात. गावातही जागृती होण्यासाठी गावाला बरेच मूल्य द्यावे लागले आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, लिंबाळवाडीतील घटनेला जबाबदार कोण, हे प्रशासनाने अद्याप निश्चित केले नाही.