शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

लाडाची लेक सीमेवर लढणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST

लातूर शहरासह जिल्ह्यात एकूण १२ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा याेजनेंतर्गत एनसीसीमध्ये जवळपास २०० मुलींना प्रशिक्षण दिले जाते. यातून आता एनडीए, ...

लातूर शहरासह जिल्ह्यात एकूण १२ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा याेजनेंतर्गत एनसीसीमध्ये जवळपास २०० मुलींना प्रशिक्षण दिले जाते. यातून आता एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांद्वारे लष्करात दाखल हाेता येणार आहे. सावित्रीच्या लेकींना आता सीमेवर शत्रूविराेधात लढा देता येणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाने या लेकींना माेठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल...

सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले आहे. आता राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी अर्थात एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींना देता येणार आहे. यातून स्थानिक एनसीसीमधील मुलींना आता देशसेवेची संधी मिळणार आहे.

प्रत्येक क्षेत्रात मुलींनाही समान संधी देण्यात आली आहे. याला अपवाद एनडीए हाेते. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाने एनडीएची दारेही आपल्या निकालाने खुली केली आहेत. हा निकाल देशभरातील लाखाे मुलींसाठी दिलासादायक ठरला आहे.

लातूर जिल्ह्यातील २०० मुलींना मिळेल संधी

लातूर शहर आणि जिल्ह्यातील १२ महाविद्यालयात एनसीसी कॅम्प घेतले जातात. यातून जवळपास २०० मुली प्रशिक्षण घेतात. आता या मुलींना सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांद्वारे लष्करात भरती हाेता येणार आहे.

लष्करामध्येही मिळणार प्रवेश...

देशाच्या सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने देशभरातील लाखाे मुलींना लष्करात भरती हाेण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी, आयएमए आणि ओटीएसरख्या विभागात भरती हाेता येईल. यातून देशसेवा करण्याची संधी आता मुलींना मिळेल.

लेकींनी मानले न्यायालयाचे आभार...

हा निर्णय मुलींसाठी वेगळ्या क्षेत्रात संधी देणारा ठरणार आहे. आजपर्यंत या क्षेत्राची दारे मुलींसाठी बंद हाेती. आता या निकालामुळे एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींना देता येणार आहे. या क्षेत्रात मुली आपले कर्तृत्व सिद्ध करतील. हा विश्वास वाटताे.

सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशभरातील मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीत भरती हाेण्याची संधी मिळणार आहे. यातून आता मुलींना देशसेवा करता येणार आहे. परिणामी, एनसीसीच्या मुलींना निकालातून दिलासा मिळाला आहे.

देशासह जगभरातील विविध क्षेत्रात मुली आज आघाडीवर आहेत. विज्ञान, समाजकारण, राजकारण, शिक्षण आणि संशाेधनाच्या क्षेत्रात मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने मुलींनाही एनडीएमध्ये प्रवेश मिळणार आहे. हा निर्णय महत्वाचा आहे.