शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय युवा मित्रमंडळतर्फे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:18 IST

शिवभोजन थाळीमुळे गरजूंना आधार लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या वतीने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे ...

शिवभोजन थाळीमुळे गरजूंना आधार

लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या वतीने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे गरजूंना मोफत शिवभोजन थाळीचा उपक्रम राबविला जात आहे. लातूर शहरातील विविध शिवभोजन केंद्रावर गरजूंना थाळीचे वितरण केले जात आहे. गंजगोलाई, दयानंद गेट परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेणापूर नाका आदी ठिकाणच्या केंद्रावर कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शिवभोजन थाळी वाटप केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आधार मिळाला आहे.

गृह विलगीकरणातील रुग्णावर आरोग्य विभागाचा वॉच

लातूर : जिल्ह्यात जवळपास ७० टक्के रुग्ण सौम्य लक्षणाचे आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने गृह विलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे. या रुग्णावर आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लक्ष ठेवले जात असून, पाहणी करण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सुंदर हस्ताक्षरासाठी ऑनलाईन वर्ग

लातूर : गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. केवळ ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु असल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले आहे. विविध शाळांच्या वतीने सुंदर हस्ताक्षरासाठी ऑनलाईन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. पालकांनी आपल्या पाल्याचा घरच्या घरीच सराव करून घ्यावा, असे आवाहन शाळांच्या वतीने करण्यात येत आहे. लिहिण्याची सवय मोडल्याने अनेक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर खराब झाले असल्याचे चित्र आहे. यासाठी शाळांच्या वतीने पुढाकार घेतला जात आहे.

पाणीटंचाई निवारणासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव

लातूर : जिल्ह्यातील १५ गावे आणि ३ वाडी वस्त्यांवर पाणीटंचाई तीव्र झाली आहे. सदरील ग्रामपंचायतच्या वतीने पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. संबंधित तहसील प्रशासनाच्या वतीने पडताळणी करून या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने ११ कोटी ७० लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात असल्याचे टंचाई निवारण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

प्राचार्या सलीमा सय्यद यांचा सत्कार

लातूर : वसंतराव काळे खासगी माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सलीमा सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. विक्रम काळे, युवराज शिंदे, तानाजी भोसले, सुधाकर होळंबे, दिलीप तेलंग, शिवाजी पाटील, विलास पुरी, जरीना कुमठे, मैनोद्दीन शेख आदींसह पतसंस्थेच्या सभासदांची उपस्थिती होती.

व्यंकटराव देशमुख महाविद्यालयात जयंती

लातूर : बाभळगाव येथील व्यंकटराव देशमुख महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. अंगद कोते, प्रा. सोपान डोपे, बालाजी देशमुख यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. कटारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

लातूर : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील दयानंद गेट परिसर, बार्शी रोड, पाच नंबर चौक, रेणापूर नाका, औसा रोड, राजीव गांधी चौक, गंजगोलाई आदी भागात स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.