शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याच्या दरात आणखीन घसरण; टोमॅटो ८, कोबी १० रुपये प्रतिकिलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST

उदगीर : येथील बाजारपेठेत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत दर निम्म्यावर आले आहेत. टोमॅटोचे दर ...

उदगीर : येथील बाजारपेठेत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत दर निम्म्यावर आले आहेत. टोमॅटोचे दर तर प्रचंड गडगडले असून, केवळ ८ रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. महाग असलेला हिरवा वाटाणाही ४० रुपये किलो रुपयांपर्यंत उतरला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

तालुक्यात परतीच्या जोरदार पावसामुळे खरिपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले; परंतु या पावसाने विहिरी, नाले, तलावांत बऱ्यापैकी पाण्याचा साठा झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कुमठा, लोहारा, माळेवाडी, नागलगाव, मोघा, बनशेळकीसह अन्य गावांतील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. दोन आठवड्यांपासून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. सध्या टोमॅटोची व कोबीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, चांगल्या प्रतीचे टोमॅटो पाच रुपयांपासून आठ रुपयांपर्यंत मिळत आहेत, तर कोबी १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मध्यंतरी भाजीपाल्याचे दर वाढले होते; पण आवक कमी होती. त्यामुळे काही प्रमाणात मागणी वाढली.

सध्या कोथिंबिरीची जुडीही पाच रुपयांना झाली आहे. इतर भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा सध्या निम्म्यावर आले आहेत. मेथीच्या दोन जुड्या १० रुपयांना, तर पालकसुद्धा त्याच दराने विक्री होत आहे.

३० रुपये किलो दराने मिळणारी वांगी १५ रुपयांवर, तर ४० रुपये किलो असणारी सिमला मिरची २० रुपये किलो झाली आहे. मिरचीचीही आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने ३५ रुपयांवरून दर निम्मे होत १२ ते १५ रुपयांपर्यंत झाले आहेत. हिरव्या वाटाण्याचा दर मागील आठवड्यात ८० ते १०० रुपये असा होता. या आठवड्यात भाव उतरून ४० रुपये किलोवर आले आहेत. कोबीचाही दर निम्म्यावर आला असून, ती १० रुपये किलोने मिळत आहे. कांदा व बटाट्याचा दर मात्र थोडासा वधारला आहे. चांगल्या प्रतीचा कांदा २५ ते ४० रुपयांपर्यंत मिळत आहे, तर बटाटे ४० रुपये किलो दराने विकले जात आहेत.

भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने दर घसरले आहेत. दररोज आवक चांगली होत असून, त्या तुलनेत मागणी नसल्याने दरात वाढ होण्याची शक्यता नाही.

भाजीपाला विक्रेते शेख फैयाज म्हणाले, मागील महिन्यापेक्षा सध्या तालुक्याच्या काही भागांतून आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. एवढे दर कमी होऊनसुद्धा ग्राहक खरेदीसाठी धजावत नाहीत. अशावेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर कसा मिळेल? त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे.