शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या पीक विम्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांची चेष्टा

By आशपाक पठाण | Updated: June 15, 2024 18:14 IST

हजारोंना प्रतिक्षा; गावोगावी चार दोन शेतकऱ्यांना आली रक्कम

लातूर : जिल्ह्यात गतर्षी खरीप हंगामात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नात मोठी घट झाली. सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात असताना पावसाने उघडील दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी फुलांची गळती झाली. याचा फटका जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना बसला. पीक विमा कंपनीकडून काही शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्यात आला. आता उर्वरित रक्कम गावोगावी मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आली असून इतर शेतकरी मात्र आपल्या माेबाईलवर कधी मेसेज पडणार याकडे लक्ष लावून बसले आहेत.

खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिक विमा भरला होता. त्यावेळी सोयाबीनचे पीक ऐन फुलोऱ्यामध्ये असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. राशी केल्यानंतर अनेकांच्या पदरात उत्पादन खर्चही पडला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. पावसाने ओढ दिल्याने पिकांचे नुकसान झाल्याची पाहणी वेळोवेळी विमा कंपनीकडून करण्यात आली होती. शेवटी पीक कापणी प्रयोग सुद्धा केले. जिल्हाधिकारी स्वतः हजर राहून पीक कापणी प्रत्यक्ष करून घेतले. तो अहवाल कृषी खाते महसूल खाते व संबंधित पीक विमा कंपनी व गावकरी यांच्या समक्ष आणेवारीसाठी सोयाबीनचे प्रात्यक्षिक केले. त्यात ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आली आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भामध्ये पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा सर्व शेतकऱ्यांना दिलेला आहे. आता मे महिन्याच्या २७ तारखेला काही गावांमध्ये चार-पाच जास्तीत जास्त दहा किंवा एखाद्या गावामध्ये दोन-तीन अशा शेतकऱ्यांना फक्त विमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केलेली आहे उर्वरित शेतकरी एकमेकांना विचारणा करीत आहेत.

विमा कंपनीचे भरपाईचे नेमके निकष काय...

पिक विमा वाटपासाठी विमा कंपनीचे कोणते निकष आहेत. दोन सख्खे भाऊ असून बंधाऱ्याच्या बाजूच्या शेतकऱ्याला विमा आला. एका भावाला विमा आला अन् एक भाऊ पंधरा दिवसांपासून नुसतीच वाट पाहतोय. मोबाईलवर मेसेज आला की पिकविम्याचाच असावा असा समज करून पाहत आहे. असे प्रकार गावोगावी घडत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम न आल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक...

शेतकऱ्यांना तत्काळ पिक विमा वाटप करावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित रक्कम जमा करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अरूणदादा कुलकर्णी, माजी अध्यक्ष राजेंद्र माेरे, अशोक दहिफळे, हिराचंद जैन, नवनाथ शिंदे, गोरोबा मोदी, नारायण भिसे, अण्णासाहेब भिसे, जयराम भिसे, बाळासाहेब वायाळ, महेश वायाळ, व्यंकट निलंगे, राजीव कसबे, रंगनाथ पुजारी आदींनी केली आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी