शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातबंदीच्या विरोधासाठी शेतकऱ्यांचे राख-रांगोळी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:40 IST

लातूर येथे शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राख-रांगोळी आंदोलन केले. यामध्ये निर्यातबंदी आदेशाची होळी करून रांगोळी घालण्यात आली.

लातूर : खरिपाच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच कांद्यावर निर्यातबंदी लादून शासनाने शेतकऱ्यांना अधिकच अडचणीत आणले आहे, असा आरोप करीत बुधवार दि. २३ रोजी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राख-रांगोळी आंदोलन केले. यामध्ये निर्यातबंदी आदेशाची होळी करून रांगोळी घालण्यात आली.

गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी वेळेवर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र काही सोयाबीन कंपन्यांनी दगा दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक जणांना दुबार पेरणी करावी लागली. तर उडीद, मूग या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. मागील आठवड्यातील मुसळधार पावसामुळे सोयाबीनही वाहून गेले.

या नुकसानीचे साधे पंचनामेही प्रशासनाने केलेले नाही. त्यातच आता शासनाने कांदा निर्यातबंदी लादून अडचणीत मोठी भर टाकली आहे, असा आरोप करीत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राख-रांगोळी आंदोलन केले.

आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधव मल्लेशे, माजी जिल्हाध्यक्ष माधव कंदे, किशनराव शिंदे, अशोक भोसले, अ‍ॅड. संतोष शिंदे, करण भोसले, किशोर महाराज शिवणीकर, विठ्ठल संपत्ते, बालाजी महाके, वसंत कंदगुळे, अण्णाराव चव्हाण, हरिश्चंद्र सलगरे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीonionकांदा