शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

किसान समन्वय समितीचे धरणे आंदोलन; शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 17:13 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरतुदींमध्ये शेतीमालाला कोठेही विक्री करण्यास निर्बंध नव्हते.

लातूर - केंद्र शासनाने तीन कृषीविषयक कायदे मंजूर केलेले आहेत. सदरील कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बदल होणार असून, आवश्यक वस्तू कायदा व कंत्राटी शेती पद्धत होणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, तीनही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती लातूरच्या वतीने सोमवारी गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी ॲड. उदय गवारे, ॲड. विजय जाधव, धर्मराज पाटील, डॉ. संजय मोरे, विश्वंभर भोसले, ॲड. इरफान शेख, रामराव गवळी, एम.आय. शेख, सत्तार पटेल, एन. ए. इनामदार, प्रा. सुधीर देशमुख, प्रा. सुदर्शन बिरादार, पंढरीनाथ जाधव, दत्ता सोमवंशी, माणिक कोकणे, सुभाष राचन्ने, शिवाजीराव लोखंडे, आर. वाय. शेख, किरण पवार, महारुद्र चौंडे, श्रीनिवास बडुरे, बाळ होळीकर, कैलास कांबळे, रफिक सय्यद, अल्ताफ शेख, प्रा. एम. पी. देशमुख, प्रा. प्रवीण कांबळे, अंतेश्वर कुदरपाके, मोहसीन खान, ज्ञानदेव कोंदमगिरे, श्रीनिवास बधुरे, एम. आय. शेख आदींची उपस्थिती होती.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरतुदींमध्ये शेतीमालाला कोठेही विक्री करण्यास निर्बंध नव्हते. राज्यातील बाजार समितीची रचना किमान आधारभूत किंमत खात्रीने देऊ शकणारी कायदेशीर रचना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर भरावा लागत नाही. तर व्यापाऱ्यांना नाममात्र कर आकारणी होते. मात्र, नवीन कृषीविषयक कायद्यांमुळे यात बदल होणार आहे. त्यामुळे कृषीविषयक तीन कायदे रद्द करावेत, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी