शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

Corona In Latur : कोरोनाच्या सावटातही माणुसकीचे दर्शन; सामाजिक संस्था देत आहेत भुकेल्यांना भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:39 AM

वसुंधरा प्रतिष्ठान, रूद्र प्रतिष्ठान आणि राहूल पाटील मित्र मंडळाचा उपक्रम 

लातूर - कोरोना या महाभयंकर साथ आजाराला रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी आहे. या संचारबंदीमुळे गोरगरीबांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला असला तरी सामाजिक संस्था त्यांच्या मदतीला धावत आहेत. लातूर शहरातील बेवारस आणि गोरगरीबांना अन्नाचा घास या संस्था भरवत आहेत. वसुंधरा प्रतिष्ठान, रूद्र प्रतिष्ठान आणि राहूल पाटील मित्र मंडळाचे पदाधिकरी या गोरगरीबांना जेवण पुरवत आहेत.

वसुंधरा प्रतिष्ठान, रूद्र प्रतिष्ठान आणि राहूल पाटील मित्र मंडळाने माणुसकीचा धर्म वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोनामुळे सर्व हॉटेल्स बंद आहेत. अनेकजण लातूर शहरात भिक्षा मागून आपल्या पोटाची खळगी भरतात. अनेकांना कामही नाही, त्यामुळे खायचे काय हा प्रश्न डोळ्यांसमोर उभा आहे. अशात लातूर शहरातील या स्वयंसेवी संस्था अन्न पुरवठा करण्याचे कार्य करीत आहेत. वसुंधरा प्रतिष्ठान जमेल तितक्या लोकांना अल्पोपहार आणि अन्नदान करीत आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, सदस्य प्रशांत स्वामी, शीतल मगर, अभिजीत स्वामी यांनी सहभाग नोंदवत शहरभर फिरून अन्नदान केले.

रूद्र प्रतिष्ठानचे सुमीत दीक्षीत, प्रशांत एवरीकर तसेच राहूल पाटील मित्रमंडळाचे राहूल पाटील, अकाश गायकवाड, प्रविण येळे, मुस्ताफा सय्यद आदी कार्यकर्ते सामाजिक बांधिलकीतून लातूर शहरात हा उपक्रम राबवित आहेत. या संस्थांनी गुरूवारी शहरातील मध्वर्ती बसस्थानक, गंजगोलाई, सम्राट चौक तसेच शहरातील अन्य भागात खिचडी, पोहे, सुशीला आदी खाद्यपदार्थांचे  पाकीट करून वाटप केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर