शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर काेणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

लातूर जिल्ह्यातील लातूर-नांदेड, लातूर-औसा-तुळजापूर, लातूर-रेणापूर-अंबाजाेगाई आणि अहमदपूर अंबाजाेगाई या मार्गावर अशा लुटारूंच्या टाेळ्या सक्रिय असल्याचे काही घटनावरून पुढे आले ...

लातूर जिल्ह्यातील लातूर-नांदेड, लातूर-औसा-तुळजापूर, लातूर-रेणापूर-अंबाजाेगाई आणि अहमदपूर अंबाजाेगाई या मार्गावर अशा लुटारूंच्या टाेळ्या सक्रिय असल्याचे काही घटनावरून पुढे आले आहे. अचानक वाहनला धक्का मारणे, यातून वाद घालणे आणि लुटण्याचा कट रचण्याचा प्रकार घडला आहे. यासाठी महामार्गावर आणि इतर ठिकाणी काेणी विनाकारण वाद काढत असेल, आपल्या वाहनाचा पाठलाग करत असेल तर सावध राहिले पाहिजे. एखाद्या ढाब्यावर चहा-नाश्त्यासाठी थांबणार असाल तर, तेथील परिस्थिती आणि वेळ पाहून थांबावे. अशावेळी आपला पाठलाग हाेण्याची शक्यता अधिक असते. पाेलिसांनी वाहन लुटण्याच्या, दराेड्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना यापूर्वी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून धारदार शस्त्र, मिरची पूड आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

अनेकांची झाली ठिकठिकाणी लूट...

आपण प्रवास करत आहात, बाजारपेठेत आणि बॅंक परिसरात काही व्यवहारानिमित्त वावरत असाल तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यावेळी आपल्याला काेणी गाेडगाेड बाेलत आहे का, काेणी जवळीकता साधून संवाद साधत असेल तर अधिक सावधानता बाळगली पाहिजे.

असे तुमच्याही बाबतीत घडू शकते...

१ जवळपास दीड लाखांची रक्कम एक पाेलीस कर्मचारी औसा राेडवरील बॅंकेतून घेऊन घराकडे निघाला हाेता. दुपारची वेळ हाेती, यावेळी एकजण म्हणाला, तुमच्या शर्टला काही तरी घाण लागली आहे. अशावेळी त्यांचे लक्ष विचलित झाले. यावेळी दीड लाखांची राेकड पळविण्यात आली. यातील चाेरटे अद्याप हाती लागले नाहीत.

२ काही दिवसांपूर्वी चाकूर ते शिरूर ताजबंद मार्गावर पहाटेच्या वेळी एका ढाब्यावरून चहा घेऊन निघालेल्या प्रवाशांना लुबाडण्यात आल्याची घटना घडली हाेती. वाहनावर ठेवण्यात आलेल्या बॅगांची दाेरी कापून त्या बॅगा पळविण्यात आल्या. यामध्ये साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

काय काळजी घ्याल..?

आपण शहरासह बाजारपेठेत वावरताना संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. काेणी आल्यावर नजर ठेवून आहे का, याबाबत सावधानता बळगावी. प्रवासादरम्यान, काेणाही अनाेळखी व्यक्तीशी फारसा संवाद साधू नये, काेणी खाद्यपदार्थ देत असेल तर ते स्वीकारू नये. त्याचबराेबर चाैकात किंवा रस्त्यावर आपल्याशी काेणी विनाकारण हुज्जत घालत असेल, वाद घालत असेल तर समयसूचकता बाळगत सुरक्षित ठिकाण गाठावे. अशा वेळी समाेरचे चार-पाच जण आणि आपण एकटे असताे. त्याचवेळी आपणाला लुटण्याचा प्रयत्न केला जाताे.