शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात आणखी ५३१ कोरोना बाधितांची भर; ५३४ जण कोरोनामुक्त, २९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 20:58 IST

कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, शुक्रवारी आणखी ५३१ बाधितांची भर पडली असून, ५३४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. तर २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लातूर : कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, शुक्रवारी आणखी ५३१ बाधितांची भर पडली असून, ५३४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. तर २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता बाधितांचा आलेख ८६ हजार ९८५ वर पोहोचला असून, यातील ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत ४ हजार ५९६ रुग्ण गृहविलगीकरण व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी १३०७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १७७ रुग्ण बाधित आढळले. तर २७३५ व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात ३५४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही चाचण्या मिळून ५३१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सध्या रुग्णालयात ४ हजार ५९६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी २७३७ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर १ हजार ८५९ रुग्ण विविध कोविड केअर सेंटर व दवाखान्यात दाखल आहेत. उपचार घेत असलेल्या ४ हजार ५९६ रुग्णांपैकी ५७२ रुग्ण आयसीयूमध्ये, ३० रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर तर २५६ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. ८३१ रुग्ण मध्यम परंतु, ऑक्सिजनवर असून, ३१० रुग्ण मध्यम परंतु विनाऑक्सिजनवर आहेत. तर ३ हजार १६९ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख यांनी दिली.

५३४ रुग्णांना मिळाली सुटी...एकूण ८६ हजार ९८५ रुग्णांपैकी ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी ५३४ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ३७६, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १९, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ७, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील २२, औसा ग्रामीण रुग्णालयातील २, कासारशिरसी येथील १, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ४३, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ३, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथील ८, निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील २, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील ७, सामाजिक न्याय भवन लामजना येथील ३, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन येथील २६ अशा एकूण ५३४ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.

बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्के...आतापर्यंत ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण १.८ टक्के असून, रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधी २४ दिवसांवर गेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस