शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीची रक्कम तीन वर्षांपासून रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:17 IST

लातूर : विद्यार्थिनींच्या शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून राज्य शासनाच्यावतीने गेल्या काही वर्षांपासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविण्यात ...

लातूर : विद्यार्थिनींच्या शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून राज्य शासनाच्यावतीने गेल्या काही वर्षांपासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. मात्र, सन २०१७-१८ पासून शासनाकडून निधीच उपलब्ध झाला नसल्याने तीन वर्षांपासून सदरील शिष्यवृत्तीचे वाटप झाले नाही. परिणामी, विद्यार्थिनी व पालकांतून नाराजी व्यक्त होत असून सातत्याने चौकशी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील बहुतांश विद्यार्थिनी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असल्याचे पाहून राज्य शासनाने त्यांना शिक्षण मिळावे तसेच त्यांना शिक्षणाची गोडी लागावी. सदरील प्रवर्गातील विद्यार्थिनी नियमितपणे शाळेत याव्यात आणि शैक्षणिक गळतीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविण्यास सुरुवात केली. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागास सूचनाही केल्या. त्याचा चांगला परिणाम दिसून येऊ लागला.

या योजनेअंतर्गत इयत्ता ५ ते ७ वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना दर वर्षाला ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अर्थात दिवसाला दोन रुपये उपस्थिती भत्ता आहे. सदरील रक्कम गेल्या दोन वर्षांपासून लाभार्थ्याच्या थेट खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे सदरील प्रवर्गातील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य घेण्यास काही प्रमाणात मदत होऊ लागली. जनजागृतीमुळे पालकही आपल्या पाल्यास नियमितपणे शाळेत पाठविण्यास सुरुवात केली.

१६ हजार विद्यार्थ्यांना प्रतीक्षा...

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन २०१७-१८ मधील २ हजार ४५०, सन २०१८-१९ मध्ये ६ हजार ६०३ तसेच सन २०१९-२० मधील ७ हजार ३०० विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता थकीत राहिला आहे. एकूण १६ हजार ३५३ विद्यार्थिनींची शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने देण्यात आली नाही.

१ कोटींची आवश्यकता...

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन २०१७-१८ पासून थकीत रक्कम राहिली आहे. जिल्ह्यासाठी साधारणत: १ कोटींची आवश्यकता आहे. निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. सन २०२०-२१ या वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.

उपस्थिती वाढण्यास मदत...

सदरील योजनेमुळे विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींची उपस्थिती वाढण्यास मदत झाली आहे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून सदरील शिष्यवृत्ती थकीत राहिली आहे. आम्हीही सातत्याने समाजकल्याण विभागाकडे चौकशी करत आहोत, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.