शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

मला काय होतंय ही वृत्ती जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:24 IST

पुण्यामुंबईसह बाहेरून येणाऱ्या नातेवाईकांना थेट घरात राहण्यासाठी घेणे धोकादायक आहे. अनेकांची घरे लहान असतात. एकत्रित कुटुंबे असतात. त्यांनी तर ...

पुण्यामुंबईसह बाहेरून येणाऱ्या नातेवाईकांना थेट घरात राहण्यासाठी घेणे धोकादायक आहे. अनेकांची घरे लहान असतात. एकत्रित कुटुंबे असतात. त्यांनी तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घर स्वच्छ ठेवले पाहिजे. वारंवार ज्यांना बाहेर जाण्यावाचून गत्यंतर नसेल अशांनी घरातील ज्येष्ठ, आजारी व्यक्ती, लहान मुले यांच्यापासून लांब रहावे. घरातही मास्क वापरला पाहिजे. अनेकजण एक मास्क काळाकुट्ट् होईपर्यंत वापरतात. तसे न करता तो प्रत्येक दिवशी बदलून धुतला पाहिजे.

रोजच्या जेवणात अंडी, मिळतील ती फळे, भाजीपाला याचा वापर केला पाहिजे. पातळ पदार्थ घेतले पाहिजेत. ताक, आंबील घेतली, लिंबू सरबत घेतले तरी चालेल. शक्य तितका व्यायाम केला पाहिजे. वाफ घेणे, गरम पाणी पिणे या काही गोष्टी सहज शक्य आहेत त्या केल्या पाहिजेत. मुळात या काळात कोणताही घरगुती, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करू नये किंवा असे कोणी आयोजन केले असेल तर जाऊही नये.

रोज सकाळी आणि संध्याकाळी किमान दहा मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. चालताना जर श्वास घेणे जड जाऊ लागले तर आपल्या तब्येतीचा काही तरी प्रश्न आहे असे ओळखावे आणि गावातील डॉक्टर, आरोग्य उपकेंद्राशी संपर्क साधावा. एखादा नागरिक पॉझिटिव्ह आला म्हणजे फार मोठे काही होत नाही. परंतु काळजी घेण्याचे प्रमाण वाढवावे लागते. घरात जर त्याच्यासाठी स्वतंत्र खोली, जोडूनच शौचालय नसेल तर मग ग्रामसमिती किंवा डॉक्टरांशी बोलून रुग्णालयात किंवा जेथे घरापासून दूर स्वतंत्र राहता येईल अशा ठिकाणी रहावे. या दरम्यान दिलेली औषधे, ताकद देणारे जेवण आणि ‘मी यातून ठणठणीत होणार’ ही भावना मनात ठेवली तर रुग्ण आठ, दहा दिवसांत बरा होतोच. ज्यांना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार किंवा अन्य व्याधी असतात त्यांच्यासाठी जरा जास्त जोखीम असते. या रुग्णांनी दिवसभरात प्रत्येक वेळी अर्धा तास असे पाच, सहा वेळा पालथे झोपावे. त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन जादा घेतला जातो आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. कोरोना होऊ नये यासाठी दक्षता घेणे आपल्या हातात आहे. ती घेऊनही जर झालाच तर त्याला तितक्याच समर्थपणे सामोरे जा..

१९०४२०२१ कोल डॉ. योगेश साळे

(लेखक काेल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत)