कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने अटक केलेल्या संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (वय ४८, रा. पनवेल, जि. रायगड) याच्याकडे कसबा बावडा पोलिस लाईन परिसरातील एका कक्षामध्ये रविवारी दिवसभर प्रमुख आठ प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. या सर्वांना बगल देत त्याने तपासकामासाठी असहकार्य केल्याने रात्रीपर्यंत पोलिसांच्या हाती ठोस माहिती उपलब्ध नव्हती. येरवडा कारागृहातून ताबा घेतल्यापासून तावडे राजारामपुरीच्या कोठडीत रात्री व पहाटे काही तास जप करीत असे. त्यातून तो मानसिक समाधान मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याची जपमाळ काढून घेतली. त्यानंतर ती परत द्यावी यासाठी तो विनवणी करीत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पानसरे हत्येप्रकरणी तावडेला सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. शनिवारी (दि. ३) रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत त्याला ठेवण्यात आले. रात्रभर पोलिस ठाण्यात निरीक्षक अमृत देशमुख, अरविंद चौधरी तळ ठोकून होते. त्यानंतर रविवारी पहाटे प्रातर्विधी झाल्यानंतर त्याला पोलिस मुख्यालयात आणले. या ठिकाणी पोलिसांसह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, (पान ९ वर) या प्रश्नांना बगल पानसरे यांच्या कार्यक्रमांना तू थेट विरोध केला होतास? मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्रगौंडा पाटील, सारंग अकोळकर, प्रवीण लिमकर, जयप्रकाश हेगडे तसेच भूमिगत असणारा ‘सनातन’चा साधक विनय बाबूराव पवार यांच्या संपर्कात केव्हापासून आहेस? संजय साडविलकर यांना भेटून दोन रिव्हॉल्व्हर तयार करून देण्याची मागणी केली होतीस? त्यासाठी दोन साथीदार पाठविले होतेस? अशी विचारणा केली असता त्याने या प्रश्नांना बगल देत असहकार्य दाखविले.
वीरेंद्र तावडे याचे तपासात असहकार्य
By admin | Updated: September 5, 2016 00:44 IST
कसून चौकशी : जपमाळ काढून घेतली
वीरेंद्र तावडे याचे तपासात असहकार्य
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}