शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपद आरक्षण सोडतीवरून ग्रामस्थ उद्रेकाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:37 IST

कोल्हापूर: गावात सरपंचपद निवडीवरून टोकाची ईर्षा नको म्हणून ग्रामविकास विभागाने आरक्षण सोडतच मतदानानंतर घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे; पण ...

कोल्हापूर: गावात सरपंचपद निवडीवरून टोकाची ईर्षा नको म्हणून ग्रामविकास विभागाने आरक्षण सोडतच मतदानानंतर घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे; पण रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बिनचेहऱ्याच्या या निवडणुकीत सर्वच प्रभाग सरपंचपदासाठी गृहीत धरून निवडणुका होणार असल्याने एका प्रभागात दिसणारी चुरस आता सर्वच प्रभागात होणार आहेत. त्यामुळे कोणताही चेहरा न देता निवडणुका होत असल्याने ग्रामस्थही सरपंच म्हणून कोणाला निवडायचे या संभ्रमावस्थेत आहेत. या निर्णयावरून ग्रामस्थांमध्ये उद्रेकाची भावना असून, निर्णयाच्या फेरविचारासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मंत्री यांना निवेदने देण्याबरोबरच न्यायालयात देखील जाण्याची तयारी सुरू झाली आहे.

सरपंचपदासाठी आरक्षण सोडत मतदानानंतर घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावरून ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत मतदानापुर्वीच घेतली जात असताना त्याच व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या ग्रामपंचायतींनाच वेगळा न्याय का, अशी विचारणा होऊ लागली आहे. या निर्णयामुळे आता प्रत्येक प्रभाग हा सरपंच पदासाठीच गृहीत धरून जोडण्या लावाव्या लागणार असल्याने कारभाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत निघणार होती; पण अचानक सरकारने आपला निर्णय मागे घेत १५ जानेवारीला मतदान झाल्यानंतरच ही सोडत काढण्याचा निर्णय घेतला. हे करण्यामागे सरपंचपद आरक्षण जाहीर झाले की गावात टोकाची ईर्षा निर्माण होते, पैशांचाही चुराडा होतो, असे स्पष्टीकरण ग्रामविकास खात्यानेच दिले आहे. ही ईर्षा टाळण्यासाठीच सरकारने हा मध्यममार्ग काढला असल्याचेही विभागाचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायतीसाठी सरपंच हे पूर्वी सदस्यांमधूनच निवडले जात होते; पण भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेतून थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला. यामुळे गावागावांत सरपंचपदाची निवडणूक ही आमदारकीला लाजवेल अशा पद्धतीने लढवली गेली. शिवाय बहुमत एकाकडे, तर सरपंचपद विरोधी गटाकडे असाही गुंता तयार झाला. यातून अविश्वास ठरावासह वादाचे प्रसंगही वाढले. अखेर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्या आल्या त्यांनी सर्वप्रथम थेट जनतेतून सरपंच निवडीचा आदेशच रद्दबातल ठरवला. याला सरपंच संघटनेने विरोध केला तरी शासन निर्णयावर ठाम राहिले. पूर्वीप्रमाणे सदस्यांतूनच सरपंच निवडण्याचा निर्णय घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

पूर्वीच्या प्रथेप्रमाणे निवडणुकीआधी आरक्षण साेडतीचा कार्यक्रमही जाहीर केला; पण अचानक हा कार्यक्रम महिनाभरासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. सरपंचपदाचे आरक्षण डोळ्यासमोर ठेवून संभाव्य कारभाऱ्यांनी जोडण्याही लावण्यास सुरुवात केली होती; पण या सर्वांवर महिनाभरासाठी पाणी फिरले आहे. आता या सर्वांना सर्वच प्रभागांत घाम गाळावा लागणार आहे. यातून निवडून आलेल्यांपैकी एकजण गावचा सरपंच होणार असल्याने प्रत्येक प्रभाग हा सरंपचपदाचाच समजून जोडण्या लावाव्या लागणार आहेत. त्यामुळे ज्या उद्देशाने हा निर्णय घेतला, त्यालाच हरताळ फासला जाणार आहे.

प्रतिक्रिया

सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. आम्ही सरपंच परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पुनर्विचाराची मागणी करणार आहोत. सरपंच पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाताना प्रचंड अनिश्चितता असून, इच्छुकांचा खर्च आणि मनस्ताप वाढणार आहे. हा निर्णय मागे घेऊन सरकारने पुढील नामुष्की टाळावी.

राणीताई पाटील, सरपंच परिषद महिला आघाडी राज्याध्यक्ष