शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चार माणसांमागे एक वाहन

By admin | Updated: January 19, 2015 00:31 IST

वाहने झाली उदंड : वर्षाला ५० हजार वाहने रस्त्यावर; दोन वाहने असलेली कुटुंबे अधिक

अंजर अथणीकर - सांगली जिल्ह्यामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वर्षाला किमान ५० हजार वाहने नव्याने रस्त्यावर येत आहेत. आज जिल्ह्यामध्ये ६ लाख ६८ हजार ४२२ वाहने आहेत. याचे जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण काढले असता, तब्बल चार माणसामागे एक इतके प्रमाण वाढले आहे. कुटुंबामध्ये किमान दोन वाहने, अशी संख्या झाली आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षात वाहनांच्या विक्रीचा वेग वाढला आहे. वाहन विक्रेत्यांची सुलभ कर्ज पध्दती व गरज म्हणूनही वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. विशेषत: कार आणि दुचाकींची संख्या वेगाने वाढत आहे. सांगली जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे तीस लाख असून, वाहनांची संख्या ६ लाख ६८ हजार ४२२ इतकी आहे. त्यामुळे याचे माणसी प्रमाण जवळपास साडेचार लोकांमागे एक वाहन असे झाले आहे. वर्षाला ५० ते ५५ हजार वाहने नव्याने रस्त्यावर येत आहेत. प्रौढ लोकसंख्येचा विचार केला, तर तीन माणसांमागे एक वाहन असे प्रमाण होते.
वाहनांची संख्या भरमसाट वाढल्याने विशेषत: शहरी भागात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक कुटुंबांना आता रात्रीच्या वेळी वाहन लावण्याची समस्या सतावत आहे. बहुतांशी अपार्टमेंटमध्ये पार्किंग व्यवस्था नसल्याने त्यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढत असून हे अपघात बहुतांशी वेळा मानवी चुकांमुळेच घडत आहेत. वाहन चालविताना सदैव वाहतूक नियमांचे पालन करण्याची दक्षता प्रत्येकानेच घेणे, आज काळाची गरज आहे. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात वाहनचालक व नागरिक यांच्यामध्ये जागृतीसाठी ११ ते २५ जानेवारी या कालावधित रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे.


दुचाकी, कारची संख्या वाढली
जिल्ह्यामध्ये दुचाकी आणि कारची संख्या वेगाने वाढत आहे. महिन्याला सुमारे चार हजार वाहने नव्याने रस्त्यावर येत असताना, यामध्ये दुचाकींची संख्या ही जवळपास तीन हजार आहे. त्यानंतर जीप, कार यांची संख्याही पाचशेहून अधिक आहे. मालवाहतुकीच्या छोट्या वाहनांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षभरात एकूण वाहनांच्या संख्येमध्ये दुचाकी ९.४६ टक्के, कार १२.२२ टक्के, जीप १२ टक्के, तर ट्रकच्या संख्येत ३.८२ टक्के वाढ झाली आहे.


वर्षात तीनशे जणांचा अपघाती बळी
एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ३०० जण अपघातांमुळे दगावले आहेत. यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. अपंगत्व आलेल्यांची संख्याही हजारहून अधिक आहे. सुमारे दीड हजार अपघातांची वर्षभरात नोंद झाली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणे, मानवी चुका, त्याचबरोबर वाहन व रस्ते खराब आदी कारणे अपघात वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. सार्वजनिक वाहनांचा वापरही दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.

१९८० मध्ये होते दहा हजार लोकांमागे एक वाहन
गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या वेगाने वाढली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये १९८० मध्ये दहा हजार लोकांमागे केवळ एक वाहन होते. इतकी अल्प वाहनांची संख्या होती. आता साडेचार लोकांमागे एक वाहन झाले आहे. २००० पासून वाहनांचा वेग वाढला आहे.

जिल्ह्यातील सध्याची वाहनांची संख्या
दुचाकी : ५,0९,३५०
कार : ५१,९८९
जीप : १९,५६८
ट्रक : ९०,0२१
टँकर : ६८७
डिलिव्हरी व्हॅन : २०,८८०
ट्रॅक्टर : २५,३७२
ट्रेलर : १८,0९८
जेसीबी, क्रेन : १,0१०
रिक्षा : ८,७०४
४एकूण : ६,६८,४२२