शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

लघवी पिवळी, तर पाण्याची कमतरता, तहान लागली तर प्या पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST

कोल्हापूर : निरोगी माणूस कोणत्याही वयोगटातील असला, तरी पांढरी लघवी होईपर्यंत पाणी पिणे आवश्यक आहे, असे युरोलॉजिस्ट, नेप्रॉलॉजिस्टांचे मत ...

कोल्हापूर : निरोगी माणूस कोणत्याही वयोगटातील असला, तरी पांढरी लघवी होईपर्यंत पाणी पिणे आवश्यक आहे, असे युरोलॉजिस्ट, नेप्रॉलॉजिस्टांचे मत आहे. तहान लागली की पाणी प्यावे आणि लघवी पिवळी न होता पांढरी होईल इतके पिण्याचे प्रमाण ठेवावे, असेही ते सांगतात. याउलट किडनी विकार आणि हृदयविकार असणाऱ्यांना अती पाणी पिल्यास त्रास होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शरीरात पाणी महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच शरीरातील पाण्याचे प्रमाण सातत्याने कमी झाल्यास विविध विकार होण्याचा धोका असतो. सर्वसाधारणपणे शरीरात ७० टक्के पाणी असते. त्यामुळे एकवेळ अन्न नसेल, तर चालेल तीव्र तहान लागल्यास पाणी प्यावेच लागते, असे वैद्यकीय शास्त्र सांगते.

१) शरीरात पाणी कमी पडले तर

प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी विविध मार्गाने जाण्याच्या स्थितीला शरीरातील पाणी कमी होणे किंवा 'डिहायड्रेशन' असे म्हणतात. लघवी, मल, घाम यातून रोज पाणी बाहेर जात असते. पाण्याबरोबरच शरीरातील काही प्रमाणात क्षारही जातात. पण हे प्रमाण वाढले, तर 'डिहायड्रेशन'चा त्रास होतो. डिहायड्रेशन झाल्यास घशाला कोरड पडणे, सतत तहान लागणे, डोके किंवा अंग दुखणे, लघवी कमी प्रमाणात आणि पिवळी होणे, त्वचा कोरडी पडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा असा त्रास जाणवू शकतो.

२) शरीरात पाणी जास्त झाले तर

किडनी आणि हृदयविकार असणाऱ्यांनी जास्त पाणी पिल्यास उलटी होणे, डोकेदुखी, मानसिक स्थिती बिघडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. किडनीवर जास्तीचा ताण पडताे. शरीरातील पाणी बाहेर टाकण्यास किडनी सक्षम नसेल, तर शरीरातील इलेक्ट्रोलाईटचा ताळमेळ बिघडू लागतो आणि अधिकचे पाणी शरीरात साठू लागते. परिणामी शरीराचे वजन वाढत जाते. साठलेले पाणी रक्तातील अनेक घटक पातळ करते. यामुळे शरीराला हानी होऊ शकते.

३) कोणी किती प्यावे पाणी?

वयोगट दिवसाला किती पाणी (लिटरमध्ये)

लहान मुले अर्धा लिटरपर्यंत

१५ वर्षांपर्यंत १ ते दीड

१६ ते ६१ वर्षांपर्यंत २

कोट

४) तज्ज्ञ काय म्हणतात?

निरोगी माणसाने जास्त पाणी पिल्यास आरोग्याला हानीकारकही नाही आणि फायदाही नाही. पण पिवळी लघवी होत असल्यास शरीरातील पाणी कमी झाले आहे, असे समजून पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. लघवी पांढरी होत असल्यास पाण्याचे प्रमाण योग्य आहे, असे समजावे. यामुळे नेहमी तहान लागल्यानंतर पाणी पित राहावे.

डॉ. अभिजित कोराणे, नेप्रॉलॉजिस्ट

लहान मुलांना दीड, तर १५ वर्षावरील व्यक्तींना कमीत कमी दोन लिटर पाणी दिवसाला प्यावे. कष्टाची कामे करणाऱ्यांनी यापेक्षा अधिक पाणी पिणे आवश्यक आहे. निरोगी माणसाने अधिक पाणी पिल्यास आरोग्याला अपायकारक नाही; पण हृदय विकारग्रस्त, किडनी विकारग्रस्तांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच पाणी पिण्याचे प्रमाण ठेवावे. अन्यथा त्रास होऊ शकतो.

डॉ. युवराज सावंत, नेप्रॉलॉजिस्ट