शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

वजनाच्या आडून युरिया अनुदानाला कात्रीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:30 AM

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने हळूहळू खतावरील अनुदान बंद करण्याचा घाट घातला असून, उरल्यासुरल्या युरिया खताच्या पिशवीचे वजन कमी करण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत. खताचा डोस देण्याचा शेतकऱ्यांचा हिशोब वजनाऐवजी पोत्यावर आहे, त्यानुसार प्रत्येक पोत्यात पाच किलो खत कमी करून त्यातून अनुदानावरील खर्च कमी करण्याची सरकारची मखलाशी ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने हळूहळू खतावरील अनुदान बंद करण्याचा घाट घातला असून, उरल्यासुरल्या युरिया खताच्या पिशवीचे वजन कमी करण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत. खताचा डोस देण्याचा शेतकऱ्यांचा हिशोब वजनाऐवजी पोत्यावर आहे, त्यानुसार प्रत्येक पोत्यात पाच किलो खत कमी करून त्यातून अनुदानावरील खर्च कमी करण्याची सरकारची मखलाशी आहे. त्यानुसार सध्या बाजारात५० ऐवजी ४५ किलोंची युरियाची पोती उपलब्ध आहेत.सात-आठ वर्षांपूर्वी केंद्र सरकार सर्वच रासायनिक खतांना अनुदान देत होते; त्यामुळे खतांचे दर शेतकºयांच्या आवाक्यात होते; पण खतांच्या अनुदानावर जादा खर्च होत असल्याचे सांगत केंद्र सरकारने हळूहळू खतांवरील अनुदान कमी करत आणले. मध्यंतरी युरिया वगळता सर्वच खते नियंत्रणमुक्त केली. परिणामी, खत कंपन्यांची मनमानी सुरू झाली आणि आज बहुतांशी खतांच्या किमती ११०० ते १२०० रुपये पोते (५० किलो) आहे. सगळ्यात स्वस्त खत युरिया आहे, २६५ ते २८० रुपयांपर्यंत पोत्याचा दर आहे. त्यातही विक्रेत्यांच्या मार्जिनमुळे शेतकºयांना ३०० ते ३१० रुपयांना पदरात पडतो. तरीही इतर खतांच्या तुलनेत युरियाचे खत तसे आवाक्यात आहे; पण सरकारला युरियावरील अनुदान कमी करायचे आहे; पण त्यांनी पळवाटा शोधल्या आहेत. शेतकरी कितीही प्रगत असला तरी रासायनिक खतांचा डोस पोत्यावरच देतो. सल्लागार कंपन्याही शेतकºयांना एकरी पोत्यावरच हिशेब सांगत असतात. त्यामुळे पाच, दहा, चाळीस किलोत कोणी खताचा डोस देत नाही.युरियाचा वापर शेतकºयांनी कमी करावा, यासाठी सरकार गेले अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे; पण शेतकºयांच्या आवाक्यात असल्याने इतर खतांऐवजी युरियालाच अधिक पसंती राहते. थेट अनुदान कमी करता येत नाही; त्यामुळे पोत्याचे वजन कमी करायचे, त्यातून शेतकºयांचा वापर कमी होईल. एखादा शेतकरी दहा पोती युरिया वापरत असेल तर प्रत्येक पोत्यामागे पाच किलो युरिया कमी झाल्यास आपोआपच अनुदानाचा वापरही कमी होईल, असा सरकारचा प्रयत्न आहे.युरियाही नियंत्रणमुक्त करण्याच्या हालचालीयुरिया हे एकमेव खत शेतकºयांच्या आवाक्यात आहे. तेही नियंत्रणमुक्त करून पूर्णपणे अनुदानमुक्त करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्याची सुरुवात वजनातून अनुदान कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे शेतकºयांचे मत आहे.