शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांना बारा टक्के पगारवाढीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST

एप्रिल २०१९ पासून अंमलबजावणी साखर कामगारांना बाप्पा पावला यड्राव: राज्यातील साखर कामगारांना बारा टक्के वेतनवाढीसह विविध भत्त्यांमध्ये वाढ देऊन ...

एप्रिल २०१९ पासून अंमलबजावणी

साखर कामगारांना बाप्पा पावला

यड्राव: राज्यातील साखर कामगारांना बारा टक्के वेतनवाढीसह विविध भत्त्यांमध्ये वाढ देऊन त्याची अंमलबजावणी एप्रिल २०१९ पासून करण्याचा निर्णय त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष व साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घोषणा करण्यात आली. साखर संकुल पुणे येथे बैठक पार पडली. या अंतरिम पगारवाढ ऐवजी थेट पगारवाढीच्या निर्णयामुळे राज्यातील दीड लाख साखर कामगारांना गणपती बाप्पा पावला आहे.

मार्च २०१९ च्या मूळ पगार, महागाई भत्त्यासह स्थिर भत्त्यावर १२ टक्के वेतनवाढ, व इतर भत्त्यांवर १२ टक्केप्रमाणे वाढ देण्यात आली आहे, महागाई भत्ता निर्देशांक २.७० वरून २.९० करण्यात आला आहे. सहा वर्षं सेवा झालेल्यांना एक वार्षिक वेतनवाढ तर १३ वर्षाला दोन व २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना तीन वार्षिक वेतन वाढ मिळणार आहेत. अकुशल कामगारांना २,४५० ते सुपरवायझरी कामगारांना २,७५० पर्यंत वाढ मिळणार आहे.

राज्यातील साखर कामगारांचा वेतन करार ३१ मार्च २०१९ रोजी संपला होता. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळासह विविध कामगार संघटनांच्या आंदोलनाचा पवित्र्यामुळे शासनाला त्रिपक्षीय समिती नेमली. दरम्यानच्या काळात कोरोनाचे संकट व संचारबंदीमुळे निर्णय प्रक्रियेला विलंब लागला. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समन्वय साधून तोडगा काढल्याने साखर कामगारांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला.

या बैठकीस साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार उपायुक्त रविराज इळवे, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, चंद्रदीप नरके, तात्यासो काळे, शंकरराव भोसले, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, प्रदीप बणगे, संजय मोरबाळे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

थेट पगार वाढ

साखर कामगारांचे वेतन करार संपल्यावर त्रिपक्षीय समिती अंतरिम वाढ देऊन नंतर पगारवाढीचा निर्णय घेत होती. परंतु यावेळी अंतरिम पगारवाढीऐवजी थेट पगार वाढ होत असल्याने चांगली पगारवाढ झाली आहे. लेट असेना पण थेट पगारवाढ व्हावी यासाठी आमचा आग्रह होता तो पूर्ण झाला. राऊसाहेब पाटील सदस्य त्रिपक्षीय समिती सदस्य.

शरद पवारांचाच निर्णय

साखर कामगारांच्या वेतनवाढी प्रश्नी १९९८ ते २००२ शरद पवार निवडा, त्यानंतर एप्रिल २००५ ते मार्च २००९, एप्रिल २००९ ते मार्च २०१४, एप्रिल २०१४ ते मार्च २०१९ या चार वेतनवाढीचे निर्णय शरद पवारांच्या तोडग्यामुळेच साखर कामगारांना पगार वाढ झाली आणि यावेळी ऑगस्ट महिन्यात साखर कारखानदार व कामगार प्रतिनिधीच्या बैठकीत शरद पवार यांनी तोडगा काढल्याने हा पगारवाढीचा निर्णयावर शिक्कामोर्तब झाला.