शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

प्रगतीसाठी आरक्षण मिळालेच पाहिजे

By admin | Updated: October 13, 2016 02:06 IST

अंजली साळवी : आरक्षणाअभावी प्रगती नाही

कोल्हापूर : गुणवत्ता असताना देखील मराठा तरुण-तरुणींची शैक्षणिक आणि नोकरीच्या ठिकाणी आरक्षण नसल्याने नेहमीच पिछाडी होत आहे. त्यामुळे प्रगतीसाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे, असे मत सीमंतिनी मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अंजली साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. डॉ. साळवी म्हणाल्या, ‘मराठा म्हणजेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच मराठा,’ अशी ओळख आहे.आपला मराठा समाज क्षत्रिय म्हणून नावाजलेला पण, या समाजाच्या उन्नतीकडे मराठा समाजाचे नेते, राज्यकर्त्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे या समाजाला प्रगतीचे ठोस असे कुठलेच साधन उपलब्ध नाही. बहुतांश मराठा हा शेती व्यवसाय करतो. शेतीला हमीभाव मिळत नसल्याने समाजासमोर तीव्र स्वरूपात आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे मराठा समाजातील मुला-मुलींना उच्चशिक्षण घेता येत नाही. त्याचा परिणाम समाजाच्या प्रगतीवर झाला आहे. छत्रपती शिवराय यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या मावळ्यांनी महाराष्ट्राचे अस्तित्व कायम ठेवले. हे अस्तित्व कायम ठेवणारे मराठेच होते. बदलत्या काळानुसार पुढच्या पिढीचा विचार करता, शिक्षणाची विविध दालने उभी केली. युवापिढी कष्टाने शिकत राहिली. आरक्षणाअभावी शिक्षणाचा उपयोग मात्र, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण दाखवू शकला नाही. त्याचा परिणाम ही युवा पिढी मानसिकदृष्ट्या खचली. आरक्षण मिळविण्यासह स्त्री सन्मानाची जाणीव करून देण्यासाठी मराठा समाजाने क्रांती मूक मोर्चाद्वारे पाऊल टाकले आहे. झळ बसल्याने तरुणाईच अधिक पेटून उठली आहे मराठा समाजातील खदखद लक्षात घेऊन मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक पाऊल टाकले पाहिजे.लढा शांततेच्या मार्गानेमराठा समाजाने न्याय मागण्यांसाठी क्रांती मूकमोर्चाद्वारे शांततेच्या माध्यमातून लढा उभारला आहे. ‘आता नाही, तर कधीच नाही’ हे या भूमिकेतून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आता मराठा समाज अन्याय सहन करणार नाही, असे डॉ. साळवी म्हणाल्या. समाजातील महिला बदलत्या काळानुसार घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडल्या आहेत. शिक्षण घेतल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग समाज व स्वत:ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्या नोकरीच्या शोधात बाहेर पडल्या; परंतु, क्षमता असून आरक्षणाअभावी योग्य नोकरी नाही. स्वतंत्र महामंडळ हवेमराठा समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ सुरू करावे. त्यांच्यासाठी विशेष सवलती जाहीर करून त्या कागदावर न ठेवता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी. महिलांसाठी विशेष आरक्षण दिले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या मागे पडलेल्या मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा प्राप्त होईल. या समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. भूमिका मराठाशिलेदारांच्या