शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

लोकाभिमुख धोरणांमुळे राज्यात राजकीय स्थैर्य

By admin | Updated: September 5, 2014 23:24 IST

वसंत भोसले यांचे प्रतिपादन : शांतारामबापू गरूड स्मृतिदिनी ‘महाराष्ट्र विधानसभेची वाटचाल’ विषयावर व्याख्यान

इचलकरंजी : स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्राच्या रचनेमध्ये भौगोलिक स्थित्यंतरे झाली. त्याचा राज्याच्या राजकारणावर परिणाम दिसून आला, पण राज्याच्या विधानसभेने वेळोवेळी पुरोगामी विचारसरणीने आणि विकासात्मक ध्येय-धोरणांना अनुसरून घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्रात कधीही अस्थिरता आली नाही. अलीकडच्या काळात समाजकारणापासून राजकीय पक्षांची फारकत होऊ लागल्याने राजकारणात आता अस्थिरता जाणवू लागली आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केले.येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये प्रबोधिनीचे संस्थापक आचार्य शांताराम गरुड यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र विधानसभेची वाटचाल’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे वय ५४ असले तरी राज्याच्या विधानसभेचे वय ७७ आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९३७ मध्ये ब्रिटिशांनी प्रांतिक विधानसभेची स्थापना केली. त्या काळापासूनच विधानसभेवर कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. महाराष्ट्राच्या सन १९८० पर्यंतच्या कालखंडात सर्वच विधानसभांमध्ये कॉँग्रेसचे बहुमत होते. सर्व विरोधी पक्षांचे मिळून ३० ते ४० आमदार असत. मात्र, त्या काळातील विरोधी पक्षांच्या अभ्यासू लोकप्रतिनिधींमुळे सत्ताधाऱ्यांवर एक प्रकारचा अंकुश असे. विरोधकांच्या प्रभावामुळे आणि राज्यात असलेली लोकाभिमुख सहकार चळवळ, पुरोगामी विचारसरणी, विकास-विधायक कामांसाठी होणारी ध्येय-धोरणे यामुळे महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला. एक वैचारिक बैठक राज्याच्या राजकारणाला असल्यामुळे राजकीय क्षेत्रात कधीही अस्थिरता आली नाही. महाराष्ट्राचा इतिहास अत्यंत चांगला आहे. मात्र, अलीकडच्या काळामध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता वर्तमान फारसा बरा नाही. वास्तविक पाहता सध्या सरकारकडे पैसा, आधुनिक तंत्रज्ञान, साधनसामग्री, सुशिक्षित मनुष्यबळ विपुल प्रमाणात उपलब्ध असतानासुद्धा राजकीय दिवाळखोरीमुळे विकासाची संधी गमावत आहे. राजकीय कुरघोड्या खेळण्यातच स्वारस्य असलेल्या लोकप्रतिनिधी व नेते यांची लोकांप्रती असलेली संवेदना बोथट झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला आचार्य गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. नगरसेवक शशांक बावचकर यांनी स्वागत केले, तर प्रा. रमेश लवटे यांनी प्रास्ताविक केले. अन्वर पटेल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)