शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या टंचाईने शेतकरी घाईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST

कोल्हापूर : चांगला दर मिळत असल्याने यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे. वळवाच्या पावसामुळे मशागतीची कामेही बऱ्यापैकी पूर्ण ...

कोल्हापूर : चांगला दर मिळत असल्याने यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे. वळवाच्या पावसामुळे मशागतीची कामेही बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. काहीही करून रोहिणीचा पेरा साधायचा म्हणून तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर सोयाबीन बियाण्यांच्या टंचाईने मोठे संकट उभे केले आहे. अजूनही कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे उपलब्ध नाही. यावर कृषी विभागाने घरगुती बियाणे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांची यादी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून तयार केली असून, त्यांच्याकडे संपर्क साधून बियाणे घ्यावे, असे आवाहन करण्यात आल्याने टंचाईत थोडा दिलासा मिळाला आहे.

दरावरून व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, कीड रोगांचा मारा, प्रचंड पाऊस यामुळे सोयाबीनचा पेरा गेल्या दोन वर्षांपासून घटला आहे. ५६ हजार हेक्टर असलेले क्षेत्र गेल्या वर्षी कसेबसे ३६ हजारांपर्यंत गेले. यावर्षी त्यात थोडीशी वाढ होऊन ते ४१ हजार ५०० हेक्टर इतके गृहीत धरण्यात आले आहे. यावर्षी हमीभावापेक्षाही दुप्पट भाव मिळाल्याने शेतकरी पुन्हा एकदा सोयाबीन पेरणीच्या मानसिकतेत दिसत आहे. साधारणपणे फेरपालटाचे पीक म्हणून सोयाबीन लागण होते. ऊस लागणीसाठीच्या सऱ्या सोडून बोधावर सोयाबीन पेरले जाते. गेले महिनाभर वळवाच्या पावसाने चांगला हात दिल्याने जमिनीच्या मशागतीही वेगाने पूर्ण होत आहेत. रोहिणी नक्षत्रावर पेरणी केल्यास सोयाबीन चांगले येत असल्याने तो मुहूर्त समोर ठेवत सऱ्या सोडण्याचे काम जोरात सुरू आहे. ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी तर १५ मेपासूनच पेरण्या होणार असल्याने हे शेतकरी बियाण्याच्या शोधमोहिमेत गुंतले आहेत.

मध्यप्रदेशातून येणारी सोयाबीनची आवक तेथील राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे थांबली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात उत्पादित केलेल्या सोयाबीनचाच आधार घ्यावा लागणार असल्याचे दिसत आहे. कृषी विभागानेही यासाठीची पूर्वतयारी करून ठेवली आहे. १३ हजार क्विंटल सोयाबीनचे घरगुती बियाणे उपलब्ध होईल, असे नियोजन केले आहे. तालुकानिहाय अशा बियाणे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून ती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. पंचायत समितीत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे फोन करून आपापल्या भागातील संबंधित शेतकऱ्यांकडे जाऊन बियाणे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरातही दुपटीने वाढ

महाबीजने दरात वाढ करू नये, असे शासनाने कितीही सांगितले तरी सोयाबीनच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ७० रुपये किलो असलेले सोयाबीन आता १२० रुपये किलो दराने विक्री होणार आहे. सोयाबीनचा बाजारातील दर ८ हजार रुपये क्विंटल झाल्याने आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याने ही वाढ केल्याचे सांगण्यात येत आहे.

सोयाबीन बियाणे एकूण मागणी (क्विंटलमध्ये)

महाबीज : ८ हजार ८९०

खासगी : ४ हजार ७८

एकूण : १३ हजार ७७६

घरगुती : १३ हजार