शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या धामधुमीतही रौप्यनगरीत मंदीचे सावट

By admin | Updated: October 14, 2014 23:26 IST

चांदीच्या दरामध्ये घसरण : निवडणुकीच्या तपासणीमुळे दागिन्यांसह कच्च्या चांदीची वाहतूक थांबली

तानाजी घोरपडे ल्ल हुपरी जागतिक बाजारपेठेमध्ये विविध कारणांनी निर्माण झालेली तीव्र स्वरूपाची मंदी तसेच औद्योगिक व नाणी उत्पादकांनी पूर्णपणे थांबविलेली चांदीची खरेदी यामुळे चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्ताबरोबरच वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याने चांदीच्या दागिन्यांची व कच्च्या चांदीचीही वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. या सर्व घडामोडींमुळे ऐन दिवाळीतच सर्वत्र मंदीचे वातावरण तयार झाले असून, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी ५० ते ५५ हजारांच्या घरात खेळत असणारा चांदीचा दर सध्या ३७ ते ३८ हजारांवर आला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हाच दर ३५ हजारांच्या आतही येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने आचारसंहितेच्या कालावधित संपूर्ण राज्यामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सर्वच वाहनांची कसून तपासणी केली जात असल्यामुळे चांदीचे दागिने देशभरातील बाजारपेठेवर पोहोचविण्याबरोबर दागिने निर्मितीसाठी आयात करावी लागणारी चांदीही परपेठेवरून वाहतूक करून आणणे धोक्याचे झाले आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याच्या पोलिसांच्या मानसिकतेमुळे एकही चांदी उद्योजक दागिन्यांची व चांदीची वाहतूक करण्याची ‘जोखीम’ पत्करण्याचे धाडस करीत नाही. दागिन्यांची व चांदीची वाहतूक ठप्प झाल्याने रौप्यनगरी हुपरीसह यळगूड, तळंदगे, पट्टणकोडोली, रणदेवीवाडी, सीमा भागाच्या गावांतील सर्वच व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात मंदीचे वातावरण आहे. काही दिवसांवरच दिवाळी सण आला आहे.या दिवसांमध्ये चांदीच्या दागिन्यांना देशभरातील सर्वच बाजर पेठांतून चांगली मागणी असते. या मागणींची पूर्तता करण्यासाठी उद्योजक मोठ्या प्रमाणात कष्ट घेऊन दागिने तयार करण्यासाठी धडपडत असतात. असे यापूर्वीचे चित्र वर्षांनुवर्षे पाहावयास मिळत असे. मात्र, यावेळी उलटे चित्र अनुभवण्यास मिळत आहे.खरेदी-विक्री व्यवहारावर गंडांतरगेल्या काही महिन्यांपासून जागतिक बाजारपेठेबरोबरच औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध कारणांनी मोठ्या प्रमाणात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाणी उत्पादकांकडूनही चांदीच्या मागणीचा जोर ओसरण्याबरोबरेच केंद्र शासनाने वायदे बाजारातील सोन्या-चांदीच्या व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध असल्याने चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारावर गंडांतर आले आहे. परिणामी, सट्टेबाजांनीही या व्यवहारातून पळ काढला आहे. या सर्व घडामोडींचा विपरित परिणाम होऊन चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.