शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Rain Update Kolhapur: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगा पात्राबाहेरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 11:23 IST

संभाव्य पूर परिस्थिती पाहून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, आजपासून नदी काठच्या गावांचे स्थलांतर करण्यास सुरुवात होणार आहे.

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसापासून जोरदार बरसणाऱ्या वरुणराजाने आज, बुधवारी सकाळपासून उघडीप घेतली आहे. मात्र, जिल्ह्यात काल, मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. गगनबावड्यासह चार तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पंचगंगेची पाणी पातळी आज, ३१ फूट ४ इंच इतकी झाली आहे. २७ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काल, मंगळवारीच सायंकाळी ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवार सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत राहिला. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा तालुक्यात अतिवृष्टी झाली. मंगळवारी रात्रभर अति मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य महापुराची तयारी म्हणून मंगळवारी सायंकाळी ‘ एनडीआरएफ ’ च्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.आज, सकाळी पंचगंगेची पाणी पातळी ३१ फूट ४ इंच इतकी झाली आहे. इशारा पातळी ३९ फूट असून मंगळवारी सकाळी आठ ते रात्री पर्यंत पंचगंगेच्या पातळीत तब्बल ५ फुटाने तर सोमवारच्या तुलनेत तब्बल १२ फुटांची वाढ झाली. पाणी काठावर आले असून कोणत्याही क्षणी पंचगंगा पात्राबाहेर पडू शकते.

‘वारणा’ च्या पातळीत अर्धा टीएमसीची वाढ

धरणक्षेत्रात पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे पाणी पातळी वाढ होत असून सोमवार ते मंगळवार एका दिवसात वारणा धरणात तब्बल अर्धा टीएमसी पाण्याची वाढ झाली. राधानगरी धरणातून ०.२८, तुळशी मध्ये ०.०७ तर दूधगंगा धरणात ०.४२ टीएमसीने पाणी साठा वाढला आहे.

जोर वाढला तर आजपासून स्थलांतर

पावसाचा जोर वाढत गेला तर आज, बुधवारपासून पुराच्या पाण्याचा धोका असलेल्या नागरिकांचे स्थलांतर करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जिल्ह्यातील पाऊस व संभाव्य पूर स्थितीचा आढावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला. यामध्ये महसूल यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नदी काठच्या नागरिक धास्तावले

कुंभी, कासारी, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगेसह सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे धास्तावले असून पुन्हा २०२१ च्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आहेत.27 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्गराधानगरी धरणात 84.33 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवरील 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.नदीकाठच्या गावांचे आजपासून स्थलांतरसंभाव्य पूर परिस्थिती पाहून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, आजपासून नदी काठच्या गावांचे स्थलांतर करण्यास सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी काल, मंगळवारी बैठकीत याबाबत माहिती दिली. . मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 1077 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीWaterपाणी