शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Rain Update Kolhapur: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगा पात्राबाहेरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 11:23 IST

संभाव्य पूर परिस्थिती पाहून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, आजपासून नदी काठच्या गावांचे स्थलांतर करण्यास सुरुवात होणार आहे.

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसापासून जोरदार बरसणाऱ्या वरुणराजाने आज, बुधवारी सकाळपासून उघडीप घेतली आहे. मात्र, जिल्ह्यात काल, मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. गगनबावड्यासह चार तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पंचगंगेची पाणी पातळी आज, ३१ फूट ४ इंच इतकी झाली आहे. २७ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काल, मंगळवारीच सायंकाळी ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवार सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत राहिला. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा तालुक्यात अतिवृष्टी झाली. मंगळवारी रात्रभर अति मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य महापुराची तयारी म्हणून मंगळवारी सायंकाळी ‘ एनडीआरएफ ’ च्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.आज, सकाळी पंचगंगेची पाणी पातळी ३१ फूट ४ इंच इतकी झाली आहे. इशारा पातळी ३९ फूट असून मंगळवारी सकाळी आठ ते रात्री पर्यंत पंचगंगेच्या पातळीत तब्बल ५ फुटाने तर सोमवारच्या तुलनेत तब्बल १२ फुटांची वाढ झाली. पाणी काठावर आले असून कोणत्याही क्षणी पंचगंगा पात्राबाहेर पडू शकते.

‘वारणा’ च्या पातळीत अर्धा टीएमसीची वाढ

धरणक्षेत्रात पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे पाणी पातळी वाढ होत असून सोमवार ते मंगळवार एका दिवसात वारणा धरणात तब्बल अर्धा टीएमसी पाण्याची वाढ झाली. राधानगरी धरणातून ०.२८, तुळशी मध्ये ०.०७ तर दूधगंगा धरणात ०.४२ टीएमसीने पाणी साठा वाढला आहे.

जोर वाढला तर आजपासून स्थलांतर

पावसाचा जोर वाढत गेला तर आज, बुधवारपासून पुराच्या पाण्याचा धोका असलेल्या नागरिकांचे स्थलांतर करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जिल्ह्यातील पाऊस व संभाव्य पूर स्थितीचा आढावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला. यामध्ये महसूल यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नदी काठच्या नागरिक धास्तावले

कुंभी, कासारी, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगेसह सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे धास्तावले असून पुन्हा २०२१ च्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आहेत.27 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्गराधानगरी धरणात 84.33 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवरील 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.नदीकाठच्या गावांचे आजपासून स्थलांतरसंभाव्य पूर परिस्थिती पाहून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, आजपासून नदी काठच्या गावांचे स्थलांतर करण्यास सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी काल, मंगळवारी बैठकीत याबाबत माहिती दिली. . मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 1077 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीWaterपाणी