शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघाला सत्तेचा ‘प्रसाद’ कडूच !

By admin | Updated: April 6, 2015 01:14 IST

वरुटेंचा पराभव जिव्हारी : आत्मविश्वास नडल्याने ‘परिवर्तन’ला अपयश; ‘समविचारी’तच नेतृत्वाचा वाद

$$्निराजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर प्राथमिक शिक्षक बॅँकेत सत्ता अबाधित राखण्यात राजाराम वरुटे यांना यश आले असले तरी शिक्षक संघ व करवीर तालुक्यातील अंतर्गत राजकारण थोपविण्यात त्यांना यश आले नाही. पॅनेल बांधणीत गणिते चुकूनही सुरुवातीपासून निर्माण केलेली हवा मतपेटीपर्यंत पोहोचविण्यात विरोधकांचा आत्मविश्वास नडल्यानेच त्यांना सत्तेपासून लांब राहावे लागले. निकाल पाहता, तो राजाराम वरुटेंना आत्मचिंतन करून पुढील बांधणी करायला लावणारा, तर विरोधकांची चिंता वाढविणारा ठरला आहे. बॅँकेसाठी पॅनेल जाहीर केल्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे निवडणुकीत शेवटपर्यंत रंगत राहिली. शिक्षक समिती-पुरोगामीच्या आघाडीत बराच वेळ गेला. त्यातच उमेदवारी निवडीत एकमत न झाल्याने राधानगरी, शाहूवाडी, चंदगड व पन्हाळामध्ये या पॅनेलला मोठा फटका बसला. समितीचे राज्य उपाध्यक्ष जोतिराम पाटील यांची बंडखोरी, जुन्या चेहऱ्यांना दिलेली संधी व ‘कास्ट्राईब’ला डावलल्याने त्याची किंमत मोजावी लागली. प्रसाद पाटील व कृष्णात कारंडे यांनी सत्तारूढ गटावर जोरदार हल्ला चढवीत चांगली हवा तयार केली; पण गेल्या निवडणुकीतील आकडेवारी या नेत्यांच्या डोक्यात राहिल्याने त्यांचे या निवडणुकीतील सत्तेचे गणित चुकले. त्यातच ‘पुरोगामी’चे रवी शेंडे व मनोजकुमार रणदिवे यांची बंडखोरी फारच महागात पडली. सत्तारूढ गटाचे नेते राजाराम वरुटे यांनी पॅनेल बांधणीत कमालीचा चाणाक्षपणा दाखविला. शिरोळमध्ये रवी पाटील यांचे बंड थोपविण्यात वरुटेंना अपयश आले. त्याचा फटका शिरोळमध्ये बसला. करवीरमध्ये त्यांना अपेक्षित पाठबळ मिळाले नाही; पण इतर चंदगड, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांनी साथ दिल्याने विजयापर्यंत पोहोचू शकले. ‘समविचारी’ पॅनेलमध्ये सुरुवातीपासून गोंधळ सुरू होता. नेतृत्व कोणी करायचे, हा प्रश्न सुटेपर्यंत बॅँकेची निवडणूक कधी संपली हे त्यांनाच कळले नाही. बॅँकेच्या २००९ पूर्वीच्या कारभार केलेल्या मंडळींनी प्रचाराची सूत्रे हातात घेतल्याने पराभव झाल्याची चर्चा संघाच्या कार्यकर्त्यांत आहे. समितीचे जोतिराम पाटील, संघाचे रघुनाथ खोत व रवी पाटील यांचे पाठबळ मिळाल्याने अनपेक्षितपणे पॅनेलची ताकद वाढल्याने नेत्यांचा आत्मविश्वास वाढला; पण सभासदांमध्ये विश्वास निर्माण करण्यात ते अपयशी ठरले.