शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रण मंडळाला अखेर जाग

By admin | Updated: January 20, 2015 00:06 IST

उद्या बैठक : तेरवाड बंधाऱ्याचे बरगे काढून जलपर्णी, मृत मासे, दूषित पाणी केले प्रवाहित

कुरूंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी सुस्त झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला व पाटबंधारे विभागाला ‘लोकमत’च्या दणक्याने अखेर जाग आली. आज, सोमवारी सकाळी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेरवाड बंधाऱ्याचे बरगे काढून तुंबलेले जलपर्णी, मेलेले मासे व दूषित पाणी प्रवाहित केले. तर करवीरचे प्रातांधिकारी पाटील यांनी याप्रश्नी बुधवारी (दि. २१) दुपारी बैठकीचे आयोजन केले. त्यामुळे पंचगंगाकाठावरच्या नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.पंचगंगा नदीला दूषित पाण्यामुळे नदीतील मासे मेल्याने शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. मेलेले मासे बंधाऱ्याला तटल्याने व दूषित पाणी तुंबून राहिल्याने पाण्याला उग्र वास येत होता. जलपर्णी, मेलेले मासे व दूषित पाणी वाहून जाण्यासाठी काही बरगे काढून पाणी वाहते ठेवण्याचा निर्णय झाला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेले पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण समिती यांनी येथील नागरिकांच्या तीव्र भावनांचा अनुभव घेऊनही नदी प्रदूषणावर प्राथमिक उपाय म्हणून बरगे काढून पाणी वाहते ठेवणे गरजेचे होते, असे असतानाही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने व पाणी प्रदूषणाची तिव्रता वाढल्याने ‘लोकमत’ने प्रदूषणप्रश्नी अद्याप कारवाई शुन्य या मथळ्याखाली सोमवारच्या अंकात बातमी प्रसिद्ध करण्यात आली. यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.कुरुंदवाड पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेरवाड बंधाऱ्याच्या चार सांडव्याचे बरगे काढून पाणी वाहते केले. त्यामुळे या बंधाऱ्याला तुंबलेले जलपर्णी, मेलेले मासे वाहून गेले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून ‘लोकमत’च्या वृत्ताने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग आल्याने नागरिक, आंदोलनकर्ते व पर्यावरणवादी कार्यकर्त्यांतून ‘लोकमत’चे कौतुक होत आहे. (वार्ताहर)बुधवारी बैठकतेरवाड बंधाऱ्यावर आंदोलन होऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीही कारवाईची हालचाल केले नसल्याचे ‘लोकमत’च्या वृत्ताने मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीचे अध्यक्ष करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड यांना फोनवरून याप्रश्नी निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि. २१) दुपारी करवीर प्रांत कार्यालयात सर्व विभाग अधिकारी व आंदोलनकर्त्यांची संयुक्त बैठक बोलावली आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.