शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती प्रक्रिया पुन्हा कोरोनाच्या कात्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:25 IST

सरुड : शासनाने ऑगस्ट २०१९ मध्ये जाहीर केलेल्या ५२०० पदांची पोलीस भरती प्रक्रिया पुन्हा एकदा कोरोनाच्या कात्रीत सापडली आहे. ...

सरुड : शासनाने ऑगस्ट २०१९ मध्ये जाहीर केलेल्या ५२०० पदांची पोलीस भरती प्रक्रिया पुन्हा एकदा कोरोनाच्या कात्रीत सापडली आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक निर्बंध लावल्याने राज्यातील पोलीस भरतीची ही प्रक्रिया दुसऱ्यांदा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या बेरोजगार तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने २०१९ मध्ये टप्प्याटप्प्याने १२५२८ पदांची पोलीस भरती करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ऑगस्ट २०१९ मध्येच पहिल्या टप्प्यातील ५२०० पदांची जाहिरात प्रसिद्ध करून पोलीस भरतीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. यामध्ये राज्यातील लाखो तरुणांनी या भरतीसाठी जिल्हानिहाय अर्ज केले होते. दरम्यान, गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या शिरकावामुळे देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आणि येथेचे पहिल्या टप्प्यातील या पोलीस भरतीच्या प्रक्रियेला ब्रेक लागला. गेल्या मार्च महिन्यापासूून ऑक्टोबर महिन्यापर्यंत राज्यातील प्रत्येक गावागावांत कोरोनाचा प्रभाव राहिला. नोव्हेंबरनंतर मात्र कोरोनाचा कहर कमी येऊ लागल्याने रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नव्याने वाढू लागली. सध्या कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने यावर्षीही कडक निर्बंध लावले आहेत. परिणामी याचा फटका पोलीस भरतीच्या प्रक्रियेला बसला आहे. सध्या या भरती प्रक्रियेसंदर्भात शासनाकडून कोणतेही आदेश न आल्याने अगोदरच रखडलेली ही भरती प्रक्रिया कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे गेल्या पाच ते सात वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या व भरतीची वयोमर्यादा संपत आलेल्या बेरोजगार तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोरोनाची गंभीर बनलेली सद्य:परिस्थिती पाहता ही भरती प्रक्रिया आणखी लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.