शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण दाखल होताच आरटीपीसीआर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोना लक्षणे असलेला रुग्णांवर स्थानिक डॉक्टरांकडून जुजबी उपचार केले जातात, खासगी दवाखान्यात आठ दिवस ठेवून रुग्ण गंभीर ...

कोल्हापूर : कोरोना लक्षणे असलेला रुग्णांवर स्थानिक डॉक्टरांकडून जुजबी उपचार केले जातात, खासगी दवाखान्यात आठ दिवस ठेवून रुग्ण गंभीर झाला की त्याला सरकारी दवाखान्यात पाठवले जाते, असे न करता डॉक्टरांनी रुग्णांची तातडीने आरटीपीसीआर चाचणी करून मगच उपचार सुरू करावेत अन्यथा त्यांना तहसीलदारांमार्फत नोटीस पाठवली जाईल, अशा सक्त सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनेक रुग्ण जवळच्या जनरल प्रॅक्टिशनर्सकडून जुजबी उपचार करून घेतात. लक्षणे दिसत असली तरी डॉक्टर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करायला लावत नाहीत. नंतर आजार बळावला की रुग्ण सरकारी दवाखान्यात दाखल केला जातो. तसे अनेक खासगी दवाखान्यांमध्ये आठ दिवस रुग्णांवर उपचार सुरू असतात, रुग्णाची स्थिती अतिगंभीर झाली की त्यांना सरकारी दवाखान्यात हलवले जाते यामुळे सरकारी रुग्णालयात मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यातील सर्वाधिक मृत्यू हे दाखल झाल्यानंतर शेवटच्या ७२, ४८ किंवा २४ तासांतील आहेत. याचा अर्थ त्यांना योग्य पद्धतीने उपचार मिळाले नाहीत असाच होतो. त्यामुळे डॉक्टरांनी लक्षणे दिसताच रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या डेथ ऑडिटमध्ये संबंधित डॉक्टरने ही चाचणी केली नसल्याचे आढळून आल्यास त्यांना तहसीलदारांमार्फत नोटीस पाठवली जाईल.

--

तपासण्यांमुळे पॉझिटिव्ह रेट जास्त

मंत्री पाटील म्हणाले, प्रशासनाने तपासण्या वाढवल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट जास्त दिसत आहे. तरीदेखील पूर्वीपेक्षा कमी होऊन २१ टक्क्यांवर आला आहे. तपासण्या वाढल्याने फायदाच होणार आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती रस्त्यावर फिरली की संसर्ग वाढेल, त्यापेक्षा तपासणीमुळे कोरोनाचे लवकर निदान होऊन तातडीने उपचार सुरू करता येईल. संसर्गदेखील कमी होईल.

---