शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर उड्डाणपुलाची गरज

By admin | Updated: November 11, 2014 23:26 IST

तलावाच्या स्थापनेपासून हीच स्थिती : तीन महिने पाण्यातूनच होते धोकादायक वाहतूक

अनिल पाटील - मुरगूड -मुरगूड शहरासह पंचक्रोशीत अनेक गावांना संजीवनी ठरलेला ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अधिकचे पाणी ज्याठिकाणी बाहेर पडते त्या सांडव्यावरती पुलाची आवश्यकता आहे. तलाव निर्मितीपासून आतापर्यंत या गोष्टीकडे कानाडोळा झाल्याने पावसाळ्यात कापशी, मुरगूड रस्त्यावर अंदाजे २०० मीटर पाणी वेगाने वाहते. या पाण्यातून जीव मुठीत धरून वाहनचालकांना प्रवास करावा लागतो.संस्थानकाळात अत्यंत योग्य अशा ठिकाणी मुरगूड, यमगे, शिंदेवाडी, आदी गावांतील पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी सर पिराजीराव तलावाची निर्मिती जयसिंगराव घाटगे यांच्या अधिपत्याखाली झाली. साधारणत: पाऊण टीएमसी पाणीसाठा तलावात साठतो. तलाव भरला की, तलावाच्या पश्चिमेला साधारणत: १५० ते २०० मीटर सांडवाव्यावरून वेगाने पाणी वाहते. हे पाणी गुडघाभर, तर काही ठिकाणी कमरेएवढे असते. हे पाणी मुरगूड-कापशी या मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने काहीवेळा या रस्त्यावरची वाहतूक ठप्प होते.मुरगूड शहराची व्याप्ती पाहता, दौलतवाडी, करंजिवणे, हळदवडे, हळदी, बेलेवाडी, कापशी, अलाहाबाद, आदी अनेक गावांतून मोठ्या प्रमाणात शहराशी संपर्क साधण्यासाठी लोकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. ही वाहतूक याच रस्त्यावरून होते. विशेषत: या प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही प्रचंड आहे. दोन वर्षांपासून शासकीय आय. टी.आय.सुद्धा या सांडव्याच्या पलीकडील बाजूसच बांधले आहे. या संस्थेतही साधारणत: २०० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनाही दररोज या पाण्यातूनच प्रवास करावा लागतो. यामुळे महिलांची व मुलींची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते. पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने व दोन महिने रस्त्यावरून सलगपणे पाणी वाहल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेवाळ झाले आहे. यामुळे बऱ्याचवेळी याठिकाणी मोटारसायकल घसरून लहान-मोठे अपघात घडले आहेत. ज्यावेळी पाणी वाहत असते, त्यावेळी वाहने धुण्यासाठी, पाण्याची मजा पाहण्यासाठी हौशा-नवशांची प्रचंड गर्दी होते. यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते.या सर्वांचा विचार करता सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी लोकांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या या समस्येकडे आ. हसन मुश्रीफ आणि खा.धनंजय महाडिक यांनीही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मुरगूड नगरपरिषद आणि तलाव व्यवस्थापन कार्यालय यांनी याबाबतचे प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या कामाच्या पूर्ततेबाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे.