शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाचे गटार साफ करणे आवश्यक : वागळे

By admin | Updated: January 18, 2015 00:29 IST

सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने ‘लोकशाहीतील लोकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान


सांगली : समाजकारण आणि राजकारण यामध्ये काहीही फरक नसून, राजकारणाचे गटार साफ करण्यासाठी समाजकारण करणाऱ्या व्यक्तींनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केले.
सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने मराठा समाज भवन येथे आयोजित केलेल्या ‘लोकशाहीतील लोकांची भूमिका’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे, पत्रकार विनोद शिरसाठ, अ‍ॅड. अमित शिंदे, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
निखिल वागळे म्हणाले, सध्याचे राजकारण चांगले नाही, असे म्हणून शांत राहून उपयोग नाही. सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणात यायला पाहिजे. दुर्देवाने आज कित्येक लोकप्रतिनिधींना विचारधारेशी काहीही संबंध नसतो. जेथे सत्ता असते तेथे जाणेच अनेकजण पसंत करतात. त्यामुळेच आजकाल राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक जिंकणारी यंत्रे झाली आहेत. ही परिस्थिती बदलण्याकरिता आपणच प्रयत्न केला पाहिजे. समाजात घडणाऱ्या अन्यायाविरोधात प्रत्येकाने आवाज उठविला पाहिजे. एकदा मतदान केले म्हणजे आपले कर्तव्य संपले, असा विचार करून उपयोग नाही. निवडून आलेली व्यक्ती ही जनतेची सेवक आहे. याची जाण प्रथम नागरिकांनी ठेवली पाहिजे आणि कामांचा हिशेब लोकप्रतिनिधींकडे मागितला पाहिजे. आजकाल समाजात शिक्षित लोकांची संख्या वाढली असली तरी, त्यामध्ये सुसंस्कृत व्यक्तींची मात्र कमी आहे. चांगल्या कामांची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून करणे गरजेचे असल्याचेही वागळे यांनी सांगितले. यावेळी राहुल माने यांचा सत्कार झाला. (प्रतिनिधी)