शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम समाजाने निभावले बंधुत्व

By admin | Updated: October 16, 2016 00:06 IST

खांद्याला खांदा लावून सहभाग : शेकडो कार्यकर्त्यांमुळे सुलभ नियोजन

कोल्हापूर : सकल मराठा समाजाने काढलेल्या मोर्चास तब्बल ८५ विविध जातिधर्मांच्या संस्था-संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पायांना पाने बांधून जे कष्ट घेतले, त्याला तोड नाही. आपल्या घरात एखादे शुभकार्य असल्यावर जसे सारे कुटुंब राबते, अगदी तसाच मुस्लिम समाज या मोर्चासाठी राबला. त्यामुळे मोर्चा संपवून घरी निघालेल्या प्रत्येकाच्या तोंडात या धाकट्या भावाबद्दल अत्यंत कृतज्ञतेची भावना होती. या मोर्चामुळे मराठा समाजाचे प्रश्न तर सुटतीलच; परंतु त्याच्या निमित्ताने मराठा-मुस्लिम समाजांमध्ये जो बंधुत्वाचा धागा एकदम मजबूत झाला, तो जास्त मोलाचा आहे. कोल्हापूरची भूमी ही पुरोगामी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी तिची जडणघडणच त्या विचारांनी केली आहे. त्यामुळे सगळ्या जातिधर्मांचे लोक या मोर्चासाठी पुढे सरसावले. मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला त्यामागे सगळ्यांत महत्त्वाचे हे एक कारण आहे. कोल्हापूरच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे देशात आणि राज्यात कुठेही धार्मिक तेढ निर्माण होऊन जातीय दंगे झाले तरी कोल्हापूरने कधीही मुस्लिम बांधवांच्या घरावर दगड भिरकावला नाही. तणाव जरूर असे; परंतु अशा काही प्रसंगांवेळी दोन्ही समाजांतील लोक एकत्र येऊन जातीय सलोखा कसा चांगला राहील यासाठी पुढाकार घेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी दंगलीचे निमित्त होऊन गोरगरीब मुस्लिम बांधवांचे काही माथेफिरूंनी नुकसान केले. त्यावेळी त्यांना आधार द्यायला हेच कोल्हापूर पुढे आले होते आणि हे फक्त कोल्हापुरातच घडत आले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा मोर्चा निघतोय म्हटल्यावर मुस्लिम बांधवांना सेवा करण्याची संधी मिळाली. या समाजाने या सेवेने सकल मराठा समाजाच्या हृदयात स्थान मिळविले आहे. या सगळ्या कामात गणी आजरेकर, कादर मलबारी, इचलकरंजीचे सलीम कुरणे, सलीम अत्तार, तसेच वाईफ मुजावर, इरफान मुजावर, शकील नगारजी, हांजेखान सिंदी, हाजी इर्शाद टिनमेकर, जहॉँगीर मेस्त्री, नगरसेवक निलोफर मुजावर, आदींनी सहभाग घेतला. ४कोल्हापुरातील पार्किंगच्या ६५ ठिकाणी स्वत:चे स्वयंसेवक तैनात केले होते. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत मुस्लिम बांधव त्यासाठी चॉकपीठ टाकून नियोजन करीत होते व सकाळी सात वाजता तर ‘मराठा मावळा’ असा बिल्ला छातीवर लावून मैदानावर उतरले. हे नियोजन उत्तम झाल्यामुळेच मोर्चा संपल्यावर वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. शिरोळ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी चंगेजखान पठाण, शेख यांच्या नेतृत्वाखाली भडंग, केळी आणि पाण्याचे वाटप केले. इचलकरंजीतील हाजी कैस शौकत बागवान यांच्यासह कार्यकर्त्यांनी केळी, पाणी, सरबत यांचे वाटप केले. मुस्लिम बोर्डिंगने पोलिस, मावळे, पत्रकारांसाठी आठ हजार नाष्ट्याची पाकिटे वाटप केली. पाण्याचे सव्वासात लाख पाऊच वाटप केले. त्यातील पाच लाख पाऊच हे वारणा साखर कारखान्याच्यावतीने माजी मंत्री विनय कोरे यांनी दिले होते. लियाकत रंगरेज यांनी शिवाजी महाराजांचे चित्र असलेल्या दहा हजार पिशव्यांचे वाटप केले. स्वच्छतेच्या कामातही मुस्लिम महिलांनी योगदान दिले. बागवान गल्लीने सरबत वाटप केले. कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीने चार ठिकाणी एक हजार किलो तांदळाचा पुलाव करून वाटला.