शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार

By admin | Updated: December 9, 2014 23:52 IST

रघुनाथदादा पाटील : उसाला पहिली उचल ३५०० रुपये द्या

इस्लामपूर : केंद्र शासनाने परदेशातून शेतीमालाची आयात केल्याने देशांतर्गत बाजारपेठेतील शेतमालाचे भाव कोसळले आहेत. उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळू लागल्यानेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण वाढले असून, त्याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या हंगामात उसाला ३५०० रुपयांची पहिली उचल द्यावीच लागेल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी साखर कारखानदारांना दिला.ऊसदर हक्कासाठी २५ नोव्हेंबरपासून किल्ले शिवनेरीवरून सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचे आगमन आज (मंगळवारी) इस्लामपूर येथे झाले. यावेळी त्यांनी हुतात्मा, राजारामबापू व सर्वोदय साखर कारखाना येथे कारखानदार प्रतिनिधींशी संवाद साधून ३५०० रुपयांची पहिली उचल देणे कसे शक्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ऊस तोडणी मजुरांना समान काम, समान वेतन कायद्यानुसार हार्वेस्टर यंत्राइतकीच ऊस तोडणी मजुरी मिळाली पाहिजे. केंद्रीय कृषिमूल्य व उत्पादन खर्च आयोगाने चुकीच्या पध्दतीने मूल्यांकन केल्याने शेतकऱ्यांचे २२०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून उसावर प्रतिटन ४००० रुपयांचा प्रत्यक्ष कर आकारला जातो. इतर अप्रत्यक्ष करांची यादी वेगळीच आहे. या करातील निम्मा वाटा शासनाने दिला, तर शेतकऱ्यांना ४००० रुपयांचा दर मिळेल. उत्पादन खर्च, नफ्यातील ५० टक्के वाटा व अतिरिक्त उताऱ्याचे ३०० रुपये गृहित धरून ३५०० रुपयांचा भाव देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन कृतीत आणावे. (वार्ताहर)सत्तासुंदरीची टाच दिसेनास्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर कोटी करताना रघुनाथदादांनी ‘पिंजरा’ चित्रपटातील आदर्श मास्तरची लावण्यवतीच्या नादाला लागून कशी वाताहत झाली, याची आठवण करून दिली. आज शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे स्वाभिमानीचे शिलेदार सत्तासुंदरीच्या नादाला लागले आहेत; मात्र अद्याप त्यांना या सत्तासुंदरीची टाचही दिसलेली नाही. त्यामुळे ‘यांच्या आदर्शाचा तोरा, त्यांचा कागद आहे कोरा’ अशी अवस्था झाल्याचा टोला पाटील यांनी मारला.