शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचा किमान दर ३३०० रुपये, केंद्र सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:17 IST

खुल्या बाजारात साखरेच्या किमान दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता प्रतिक्विंटल ३१०० ऐवजी ३३०० रुपयांच्या आत साखरेची खरेदी करता येणार नाही. अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला हा दिलासा मानला जात असला तरी वाढीव ह्यएफआरपीह्णमुळे साखरेचा किमान दर ३६०० रुपये करावा, यावर साखर कारखानदार आग्रही आहेत.

ठळक मुद्दे साखरेचा किमान दर ३३०० रुपये, केंद्र सरकारचा निर्णयप्रतिक्विंटल ३६०० रूपयांसाठी साखर कारखानदार आग्रही

कोल्हापूर : खुल्या बाजारात साखरेच्या किमान दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता प्रतिक्विंटल ३१०० ऐवजी ३३०० रुपयांच्या आत साखरेची खरेदी करता येणार नाही. अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला हा दिलासा मानला जात असला तरी वाढीव ह्यएफआरपीह्णमुळे साखरेचा किमान दर ३६०० रुपये करावा, यावर साखर कारखानदार आग्रही आहेत.आंतराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कमी आणि देशांतर्गत बाजारपेठेत उठाव नसल्याने गेली दोन वर्षे साखर उद्योगासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. दोन वर्षांची साखर गोडावूनमध्ये पडून राहिल्याने आर्थिक फटका बसत असून शेतकऱ्यांची एफआरपी देता आलेली नाही; तसेच अनेक कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने साखरेच्या किमान दरात वाढ करावी, या मागणीचा रेटा गेली वर्षभर सुरू आहे.

खुल्या बाजारात साखरेचा किमान दर बारीक साखरेसाठी प्रतिक्विंटल ३४५०, तर मध्यम साखरेसाठी ३६५० रुपये असावा, असे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू होते. याबाबत नितीन आयोगाच्या टास्क फोर्सने प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यावर चर्चा होऊन अखेर शिक्कामोर्तब केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.साखरेच्या दरात प्रतिकिलो पाच ते सहा रुपये वाढ झाली तर सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फारसा फटका बसत नाही. मात्र क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपये कारखान्यांना मिळाले तर तेवढी तरलता तयार होऊन कारखान्यांना फायदा होऊ शकतो.देशात २२ हजार कोटी एफआरपी थकीतसाखरेचा दर आणि एफआरपी यांचा ताळमेळ न बसल्याने सर्वच राज्यांत उसाची एफआरपी थकीत राहिली आहे. देशातील शेतकऱ्यांची २२ हजार कोटी एफआरपी थकीत आहे. त्यात एकट्या उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे १७ हजार कोटी अडकून पडले आहेत.पगार, महागाई भत्त्यावर साखरेचा दर द्याउसाला देण्यात येणारी एफआरपी, साखर कामगारांचे पगार, महागाई भत्ता यांवर आधारित साखरेचा दर निश्चित करावा, अशी मागणी राज्य साखर संघाने केंद्र सरकारकडे केली आहे.

गेली तीन वर्षे साखर कारखानदारी तोट्यात आहे. बँका नवीन कर्जे देत नसल्याने हा उद्योग चालवायचा कसा? या पेचात आम्ही आहोत. यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे साखरेचा किमान दर प्रतीनुसार ३४५० व ३६५० रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र केंद्राने ३३०० रुपये दर केला. त्यातून कारखानदारी वाचणार नाही.- जयप्रकाश दांडेगावकर,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर संघ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर