शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी, फळप्रक्रिया केंद्र कागदावरच

By admin | Updated: November 7, 2014 23:41 IST

बागायती जमिनींमुळे सधन : भुदरगड संपन्न, पण समस्या पाठ सोडेनात--भुदरगड तालुका

शिवाजी सावंत - गारगोटी -पाटगाव मध्यम प्रकल्पासह अनेक छोट्या धरणांनी युक्त असणारा भुदरगड तालुका हा हजारो हेक्टर जमिनी सिंचनाखाली असणारा तालुका आहे. सूतगिरणी, साखर कारखाना, दळण-वळणाच्या सर्व सुविधा उपलब्ध असून, शिक्षणक्षेत्रातील पंढरी असल्याने सुशिक्षितांची मांदियाळी असणारा प्रगतशील सुजाण तालुका आहे. मात्र, गेली अनेक दशके अनेक समस्या अश्वधामासारख्या सोबत घेऊन वावरत आहे. या तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचली. पुढे मौनी विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक इंजिनिअर, ग्रामसेवक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक निर्माण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक इंजिनिअर असणाऱ्या या तालुक्याला उगमापासून उत्तर-पूर्व ५७ कि.मी. वाहणाऱ्या वेदगंगा नदीने काठालगत असणाऱ्या गावांचे जीवन फुलविले आहे. या नदीवरील मौनीसागर जलाशय हा मध्यम प्रकल्प, तर फये, चिकोत्रा, कोंडोशी, मेघोली, नागणवाडी या छोट्या प्रकल्पांमुळे ७ हजार ६५७ हेक्टर जमिनी पाण्याखाली आल्या. त्यामुळे शेतकरी सुखावला. शिवाय उत्पादित होणारा ऊस तालुक्यालगतचे साखर कारखाने नेऊ लागले. भाजीपाल्यासाठीे मार्केट आहे. नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शैक्षणिक आणि बागायती जमिनीमुळे सधन असलेल्या या तालुक्यात दुर्गम, डोंगराळ भाग मागास राहिलेला आहे. वीस वर्षांपूर्वी आकुर्डे गावाच्या पठारावर मंजूर झालेली एम.आय.डी.सी. आजही कागदावरच आहे. त्यामुळे येथील भूमिपुत्रांना रोजगारासाठी गाव, घर सोडण्याशिवाय गत्यंतर नाही. जगातील पहिला महिला साखर कारखाना सुरुवातीपासूनच आर्थिक अरिष्टात सापडल्यामुळे ४०० कामगारांसह हजारो लोकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक वाहतूकदार, तोडणी कामगार, शेतकरी, छोटे-मोठे व्यावसाइक यांना हा कारखाना सुरूहोणे नितांत गरजेचे आहे.गोव्याला जोडणारा सोनवडे-घाटगे घाट हा केवळ वनविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे केवळ सात कि.मी. अंतरासाठी ठप्प झाला आहे. एकीकडे पवनचक्क्यांसाठी हजारो एकर जमिनी दिल्या जात असताना लोकांच्या सोईकरिता केवळ सात कि.मी. अंतरासाठी रस्ता दिला जात नाही. हा घाट झाल्यास कोकणात जाणे सुलभ होईल. ऐंशी कि.मी.ने गोव्याचे अंतर कमी होईल. तालुक्यातील ७० हजारांपेक्षा जास्त संख्या असणाऱ्या पाळीव जनावरांकरिता दहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र, २००६ पासून आजअखेर सहा पदे रिक्त आहेत. शासनाच्या नाकर्तेपणामुळेही करोडो रुपयांची पशुसंपदा रामभरोसे आहे. हेच चित्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संदर्भात आहे. गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालय वगळता कोठेही सुसज्ज रुग्णालये नाहीत. तालुक्यात २३ हजार ७५६ हेक्टर वनक्षेत्र आहे. या जंगलात अनेक वनौषधी आहेत. त्यांच्यावर कोणतेही संशोधन अथवा औषधनिर्माण केंद्र नाही. त्यामुळे लाखमोलाची वनौषधी विनावापर नष्ट होत आहे. आंबा, काजू, जांभूळ, करवंदे यासारख्या फळांची अनेक जाती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत; पण एखादाही फळप्रक्रिया उद्योग नसल्याने ही फळे कुजून जात आहेत. या तालुक्यात १६०० ते २००० मिलिमीटर पाऊस पडतो. धरणे भरल्यानंतर १० ते १५ टी.एम.सी. पाणी वाहून जाते. चिकोत्रा धरण बांधल्यापासून केवळ एकवेळाच भरले, अन्यथा निम्मे धरणसुद्धा भरत नाही; पण शेळोली येथे वेदगंगा नदीवर जर जल उपसा केंद्र उभारून पाणी चिकोत्रा धरणात टाकले, तर धरण पूर्ण क्षमतेने भरेल. शिवाय आणखी ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणता येईल. प्रलंबित असणारे डेळे, चिवाळे, निष्णप आणि अर्धवट स्थितीत असणारा नागनवाडी हे प्रकल्प पूर्ण झाल्यास आणखीन क्षेत्र ओलिताखाली येईल. मिणचे खोऱ्यात जाणारा कालवा अस्तरीकर न झाल्याने वेळोवेळी फुटतो. त्याचे अस्तरीकरण झाल्यास मातीचे व शेतीचे नुकसान होणार नाही.सुजलाम्-सुफलाम् आणि अतिप्रगत दिसणारा हा तालुका आजही गंभीर समस्यांच्या गर्तेत आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी काम करणाऱ्या पोलिसांना राहण्यासाठी क्वार्टर नाहीत. त्यामुळे त्यांना भाडोत्री जागेत रहावे लागत आहे. महत्त्वाच्या समस्यागेली १५ वर्षे प्रलंबित असणारी एम.आय.डी.सी. होणे नितांत गरजेचे आहे. २००६ पासून १० पैकी ६ डॉक्टर्स रिक्त पशुसंपदेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर.पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी निवास होणे गरजेचे.सोनवडे-घाटगे, पाणंद रस्ते यामध्ये अतिक्रमणात दिवसागणिक वाढ.ऐतिहासिक गडकोटांचे संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी समाधी व पर्यटनस्थळांचा विकास होणे गरजेचे.जिल्हा परिषदेच्या तालुका कृषी विभागाला स्वत:ची जागा नसल्याने कार्यालय भाडोत्री जागेत.मुदाळतिट्टा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे आवश्यक.१०१ गावे आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या १४ वाड्यांपैकी केवळ १३ गावांचा सिटी सर्व्हे झाला आहे. उर्वरित गावांचा, वाड्यांचा अद्ययावत सर्व्हे होणे आवश्यक.शेतीसाठी पाण्याची समस्या.प्रलंबित असणारे डेळे-चिवाळे, निष्णप, नागणवाडी हे लघु प्रकल्प.बेगवडे, बेडीव, सावतवाडी या गावालगत असणाऱ्या विस्तीर्ण पठारावर छोटे-छोटे वनबंधारे आवश्यक .शेळोली येथून पावसाळ्यात जलउपसा केल्यास चिकोत्रा धरण भरू शकते.गारगोटी शहराच्या समस्याशहराच्या विकासासाठी सुधारित आराखडा हवाघनकचरा आणि नाल्यातील दूषित पाणी यांच्या निस्सारणासाठी उपाययोजना आवश्यक.एकमेव अशा ग्रामीण रुग्णालयात अपघात विभाग आणि इतर संलग्न विभाग अद्ययावत होणे गरजेचेहद्दवाढ होणे आवश्यकशहरात एकही बगीचा नाही