शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

मर्कटलीलांनी ट्रॅक्टरचालक हैराण

By admin | Updated: November 30, 2015 01:15 IST

बंदोबस्ताची मागणी : पोर्ले तर्फ ठाणे परिसरातील प्रकार

पोर्ले तर्फ ठाणे : वेळ कोणतीही असू दे, ट्रॅक्टरचालक दिसला की त्याच्या अंगाखांद्यावर जाऊन बसायचे आणि जोरात श्रीमुखात लावायची (थोबाडायचे), नाहीतर त्याचा पाठीमागून चावा घेऊन जखमी करायचे. सुटकेसाठी चालकाचा आरडाओरडा ऐकून दोघे, चौघे जमले की उंच ठिकाणापर्यंत पोहोचायचे आणि वरून लोकांना चिडवायचे, अशाप्रकारे वानरांची दहशत पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील ग्रामस्थ व ट्रॅक्टरचालकांना अनुभवण्यास मिळत आहे. ट्रॅक्टरचालकांच्या मनात वानरांच्या आक्रमकतेची भीती निर्माण झाली आहे. गावाच्या कानाकोपऱ्यात उच्छाद मांडणाऱ्या या वानरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. महिनाभरापासून ४० वानरांच्या कळपाचा गावात वावर आहे. यातील एक वानर ‘नामा’निराळ्या ट्रॅक्टरमालकाच्या ट्रॅक्टरच्या बॉनेटवर बसले होते. पाठीमागून त्याने वानराच्या पाठीत काठीचा रट्टा घातला. जीव वाचविण्याच्या नादात वानर घराच्या कौलांवर जाऊन बसले. त्या ‘नामा’च्या सर्व हालचालींवर वानरांनी बारीक लक्ष दिल्याने ट्रॅक्टर चालविणाऱ्या प्रत्येक चालकाला ‘नामा’ समजून हल्ला करू लागले. गावातून ट्रॅक्टर चालविताना चालक दिसला की त्याला थोबाडीत मारायचे अथवा त्याचा चावा घेऊ लागले. दीपक नीळकंठ या चालकाला त्याने दोनवेळा चावून जखमी केले, तर आतापर्यंत २० ते २५ चालकांना श्रीमुखाचा ‘प्रसाद’ त्या वानराकडून खावा लागला आहे. ते कधी, कोठून येईल आणि हल्ला करेल याचा काही नेम नाही. गावातून ट्रॅक्टर चालविताना समोरील वाहनाला पास करायचे की घरावरून टेहळणी करणाऱ्या वानरांची नजर चुकवायची या विवंचनेत पोर्ले गावातील ट्रॅक्टरचालक सापडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने या बेधडक हल्ला चढविणाऱ्या वानरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)गावात वानरांचे प्रमाण वाढले असून, वन विभागाकडे त्यांना पकडणारे तज्ज्ञ कर्मचारी नाहीत. वानरांना पकडणारी मंडळी मिरजेत आहेत. त्यांना बोलावून त्यांचा खर्च संबंधित ग्रामपंचायतीकडे सोपविला जातो. पकडलेल्या वानरांना जंगलात सोडण्याचे काम केले जाते. - प्रशांत तेंडुलकर, पन्हाळा तालुका परिक्षेत्र अधिकारीवन्यप्राण्यांची देखभालीची जबाबदारी वनखात्याची असते. प्रत्येक गावागावांत वानरांचा उच्छाद सतत सुरू असतो. त्यामुळे त्यांना पकडून जंगलात सोडण्याची जबाबदारीसुद्धा वन विभागाचीच आहे. वन विभाग मिरजेतील तज्ज्ञ मंडळींकडे बोट करतात. म्हणजे ते पळवाट शोधत आहेत. - दिनकर चौगुले, निसर्ग व सर्पमित्र, पोर्ले तर्फ ठाणे.