शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापुरात महाडिक-सतेज पाटील वाद उफाळला; राजाराम कारखान्याच्या एमडींना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 11:43 IST

महाराष्ट्रातील पहिलीच घटना

कोल्हापूर : केवळ विरोधी गटाच्या ऊस उत्पादक सभासदांचा ऊस गळितासाठी जाणूनबुजून नेला जात नाही. नवीन ऊस नोंदी करत नाहीत, या कारणास्तव मंगळवारी (दि. २) सायंकाळी राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश जयसिंग चिटणीस (रा. हुपरी) यांना संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावरील पाटील गल्ली कॉर्नरला गाडीतून खाली ओढून अंगावरील कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रात्री खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उजव्या हातासह मानेलाही दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.या प्रकाराने सायंकाळनंतर बावड्यात तणाव निर्माण झाला. कारखान्याच्या निवडणुकीतील माजी आमदार अमल महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे.मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास कार्यकारी संचालक चिटणीस कारखान्यातील काम आटोपून कसबा बावडामार्गे कोल्हापूर शहराकडे जात असताना मुख्य रस्त्यावर पाटील गल्लीसमोर सुमारे पन्नासहून अधिक कार्यकर्ते व शेतकरी थांबले होते. त्यांनी चिटणीस यांची गाडी अडवली. त्यांना काही कळण्याच्या आतच गाडीतून बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यात त्यांचे कपडे फाटले. ते खाली पडले. त्यांच्या गाडीवरही लाथाबुक्क्या मारण्यात आल्या.गाडीतून ओडताना झालेल्या झटापटीत गाडीचा दरवाजाही वाकला. चिटणीस यावेळी मोठ्याने ओरडत होते. हात जोडत होते. तशाच अवस्थेत ते गाडीत जाऊन बसल्यावर त्यांना पुन्हा ओढून मारहाण झाली. गाडीच्या चालकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु जमावाने त्याला जुमानले नाही. गाडीच्या मागील सीटवर दोघेजण होते ते घाबरून बसल्याचे चित्रीकरणामध्ये दिसत आहे.दरम्यान, नेमकी यावेळी औद्योगिक वसाहतीमधून सुटणारी वाहने रस्त्यावर आली होती. त्यातच गळीत हंगाम सुरू असलेले उसाची वाहनेही रस्त्यावर येत होती. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. एकादा अपघात झाला की काय असे समजून बघ्यांची गर्दी वाढली. काहींनी कार्यकारी संचालक चिटणीस यांना गाडीत बसवले आणि गाडी निघून गेली. दरम्यान, घटनास्थळी शाहूपुरी पोलिसांनी काही दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या प्रकारामुळे मुख्य रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण राहिले.

गतवर्षी एप्रिलमध्ये राजाराम कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीत अनेकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. आता कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले. मात्र ऊसतोडीची तारीख ओलांडूनही केवळ विरोधक म्हणून आपला ऊस नेला जात नाही अशी भावना ऊस उत्पादक शेतकऱ्यात होती. याबाबत विरोधी गटाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर या पूर्वी दोन वेळा धडक मारून जाब विचारला; पण याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही कारखाना प्रशासनाकडून झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे मत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना संतप्त होत्या. याबाबत मंगळवारी सकाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयावर मोर्चाही काढला.

महाराष्ट्रातील पहिलीच घटनामहाराष्ट्राच्या साखर कारखानदारीतील गेल्या ७५ वर्षाच्या इतिहासात एखाद्या कारखान्याच्या कार्यकारी संचालकास ऊस नेत नाहीत या रागातून अशा पद्धतीने मारहाण होण्याची ही पहिलीच घटना आहे. कार्यकारी संचालक चिटणीस हे मूळचे हुपरीचे आहेत. त्यांनी यापूर्वी शरद, मंडलिक, कुंभी कासारी कारखान्यात काम केले आहे. गेली काही वर्षे ते राजाराम कारखान्यात कार्यकारी संचालक आहेत.

पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर तणावदोन्ही गटांचे कार्यकर्ते पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रात्री ८:३० वाजेच्या सुमारास एकाचवेळी आल्याने तणाव निर्माण झाला. सुमारे तीनशे- चारशे कार्यकर्ते होते. दोन्ही बाजूंकडून घोषणा सुरू होत्या. यावेळी पोलिसांनी संभाव्य धोका ओळखून शीघ्र कृती दलास पाचारण केले व जमावाला पांगवले. विरोधी गटाचा जमाव कसबा बावड्यातील भगवा चौकात रात्री उशिरापर्यंत थांबून होता.

जादा बंदोबस्त..मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शाहूपुरी पोलिसांनी कसबा बावड्यात शीघ्र कृती दलाची तुकडी तैनात करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिक