शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शेडबाळ-वैशाली विशेष रेल्वेची जैन समाजाची मागणी

By admin | Updated: December 24, 2015 01:05 IST

त्रिदिवसीय जन्मकल्याणक महोत्सव : वैशालीच्या विकासासाठी निधी द्या

बाहुबली : तीर्थंकर भगवान महावीर यांची जन्मभूमी वासोकुण्ड, वैशाली (बिहार) येथे १९ एप्रिल २०१६ रोजी त्रिदिवसीय जन्मकल्याणक महोत्सव होणार आहे. यासाठी पूज्य आचार्य विद्यानंदी महाराज यांचे जन्म ठिकाण शेडबाळ (कर्नाटक) ते वैशाली (बिहार) दरम्यान रेल्वे सुरू करावी. तसेच वैशालीच्या विकासासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी जैन बांधवांच्या राष्ट्रीय पातळीवर कुंदकुन्द ट्रस्ट दिल्ली, दक्षिण भारत जैन सभा, समस्त जैन समाजाने केली आहे. कोल्हापूरचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक यांच्या सान्निध्यात दक्षिण भारतातील जैन बांधवांना प्रेरित करण्यासाठी या सभेचे बाहुबली येथील एडोमेन्ट ट्रस्ट येथे आयोजन केले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कल्लाप्पाणा आवडे होते. यावेळी बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजक लाल बहादूर विश्वविद्यालय जैन विभागाचे प्रमुख डॉ. जयकुमार उपाध्ये (दिल्ली) यांनी भगवान महावीरांच्या जन्मस्थळ वैशाली येथे निर्माणाधिन विविध मंदिरांबद्दल माहिती दिली. आवाडे यांनी दक्षिण भारतात सर्वाधिक जैन समाज आहे तो अशा धार्मिक समारंभाना सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. यावेळी सतीशचंद्र जैन, माजी न्यायमूर्ती सनत्कुमार आरवाडे, अनिल जैन (कॅनडा), राजकुमार जैन (दिल्ली), रावसाहेब पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भट्टारक स्वामींनी आशीर्वचन दिले. बाहुबलीवरील प्रतिकात्मक मानस्तंभाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मिलिंद फडे पुणे, ए. ए. कापसे, महावीर गाठ, बी. टी. बेडगे, श्रीधर हेरवडे, रावसाहेब पाटील, डी. सी. पाटील उपस्थित होते.वैशाली पंचकल्याणकच्या निमित्ताने दक्षिण व उत्तर भारतातील जैन बांधवतील दरी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे जैन बांधवांमध्ये उत्साह पहावयास मिळत होता.