शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारेचे अधिकारी कर्नाटकचे हस्तक

By admin | Updated: November 23, 2015 00:05 IST

हसन मुश्रीफ : चिकोत्रा धरण भरण्यासाठी योजना

मुरगूड : काळम्मावाडी धरणातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला पाणी मिळाले पाहिजे. कर्नाटकला त्यांच्या वाटणीचे पाणी देण्यास कुणाचाच विरोध नाही; पण पाटबंधारे विभागातील अधिकारी अधिक मेहरबान होऊन महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकला जास्त पाणी देत आहेत यामागचे गौडबंगाल शोधले पाहिजे. असे प्रकार यापुढे कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. मुरगूड (ता. कागल) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काळम्मावाडीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांतून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन न झाल्याने पाणी असूनही कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, याला पाटबंधारे विभागच जबाबदार आहे. धरणातून नियोजनबद्ध पाणी सोडले पाहिजे आणि शेतकऱ्यांनीही ते जपून वापरले पाहिजे. काळम्मावाडीच्या दोन्ही कालव्यांकडे यावेळी अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे सांगून काही ठिकाणी दरडी कोसळल्या, झुडपे वाढलेली व गाळ साचला आहे. यांत्रिकी विभागाने कालवा दुरुस्त केला नसल्याने पाणी पुढे सरकलेच नाही. परिणामी, म्हाकवे भागातील पिके वाळली आहेत. पाटबंधारे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हे झाले आहे असून यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. चिकोत्रा प्रकल्पामध्येही कमी पावसामुळे ४६ टक्के इतकाच पाणी साठा आहे. यामुळे या संपूर्ण खोऱ्यात पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. उत्तूर, सेनापती कापशी परिसरातील हातातोंडाला आलेली पिके वाळून जात आहेत. त्यामुळे प्राधान्याने या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी चिकोत्रा धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. नागनवाडी व आंबेओहळ हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे. मुश्रीफ पुढे म्हणाले, आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रकल्पग्रस्थांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने २६ नोव्हेंबरला पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. चिकोत्रा धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी भुदरगड तालुक्यातील म्हातारीच्या पठारावारील पश्चिम वाहिनी ओढ्याचा मार्ग बदलण्यासाठी २५० मीटर लांब व अडीच मीटर उंच असा बांध घालून हे पाणी चिकोत्रा धरणात सोडण्याची योजना झाली आहे. या कामाचा प्रारंभ २५ नोव्हेंबरला आमदार प्रकाश आबिटकर व आपल्या उपस्थित होणार आहे. या पत्रकार परिषदेत रणजित सूर्यवंशी, परेश चौगले, महादेव हळदकर, माजी उपनगराध्यक्ष शामराव चौगले, किरण पाटील, विजय हुल्ले, दगडू किल्लेदार, दिगंबर परीट, दत्तात्रय हासबे, देवानंद पाटील, एकनाथ हासबे, एम. डी. रावण, आदी प्रमुख उपस्थित होते.