शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

‘मी पंचगंगा बोलते’ आता सोशल मीडियावर...

By admin | Updated: December 14, 2015 00:53 IST

प्रदूषणाबाबत जनजागृती : जिल्हा परिषदेचा पुढाकार; नऊ मिनिटांची चित्रफीत

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर---पंचगंगा नदी प्रदूषणासंबंधी जाणीवजागृती सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांत करण्यासाठी ‘मी पंचगंगा बोलते’ या नावाने नऊ मिनिटांची चित्रफीत तयार करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. येथील मनोहरी चित्रनिर्मिती संस्थेने ही चित्रफीत बनविली आहे. जिल्हा परिषद प्रशासन या चित्रफितीचे प्रसारण करणार आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रदूषणास विविध घटक जबाबदार आहेत. परिणामी प्रदूषित पाणी नळयोजनेद्वारे नदीकाठावरील गावांत पुरवठा झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका, औद्योगिक विभागाचे प्रशासन, जिल्हा परिषद यांनी यापूर्वी ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रत्येक सुनावणीत प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या त्याचा आढावा घेत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसारच विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी समिती कार्यरत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी विशेष लक्ष घालून पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन गतिमान केले. गणेशोत्सव काळात गणेशमूर्ती आणि निर्माल्य विसर्जनामुळे पंचगंगा नदीचे प्रचंड प्रदूषण होते. हे थांबविण्यासाठी सुभेदार यांनी यंदा चांगले नियोजन केले. भक्तांचे सहकार्य, प्रशासनाने केलेले आवाहन यामुळे मूर्ती आणि निर्माल्य दानला ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. तब्बल सातशे ते आठशे ट्रॉली निर्माल्य आणि ५० हजारांवर दान मूर्ती एकत्र करून कुणाच्याही भावनेला धक्का न लावता खुल्या खणीत आणि पडीक विहिरीत मूर्ती विसर्जित केल्या. यशस्वी झालेल्या या उपक्रमाची दखल राज्यपातळीवर शासकीय यंत्रणेने घेतली. हा उपक्रम यशस्वी कसा केला, पंचगंगा आधी कशी होती, आता तिचे स्वरूप कसे आहे, प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने राबविलेले अन्य विविध उपक्रम, लोकांचा सहभाग, प्रदूषण रोखण्यासाठी समाजातील विविध घटकांनी काय करायला हवे, आदी प्रमुख विषयांवर चित्रफितीद्वारे प्रकाशझोत टाकला आहे. राधानगरीपासून इचलकरंजी, शिरोळ तालुक्यापर्यंत नदीकाठावरील काढलेले लक्षवेधी फोटो आणि परिणामकारक संवाद, मूर्ती आणि निर्माल्य दानवेळी चित्रीकरणाचेकाही शॉटस्, पार्श्वसंगीत याचा समावेश चित्रफितीत आहे. मनोहरी चित्र निर्मिती संस्थेचे संकेत रणदिवे यांनी ही चित्रफीत तयार केली आहे. अलीकडे वाढलेल्या सोशल मीडियाचा वापर करून जागृतीसाठी आणि जिल्हा, राज्य पातळीवरील विविध आढावा बैठकीत सादरीकरणासाठी चित्रफितीचा वापर जिल्हा परिषद करणार आहे. वाढत्या प्रदूषणाबाबत ‘मी पंचगंगा बोलते’ या नावाने नऊ मिनिटांची चित्रफीत तयार केली आहे. जिल्हा परिषदेने ही चित्रफीत बनविण्याचे काम दिले होते. या चित्रफितीचे काम आता पूर्ण झाले असून, तिचे प्रसारण जिल्हा परिषद प्रशासन करणार आहे. - संकेत रणदिवे, निर्माता, मनोहरी चित्र निर्मिती संस्था